प्रतिनिधी / दहिवडी
वाळूच्या कारणावरून दोन सख्खे चुलत भाऊ व त्यांच्या कुटुंबीय यांच्या दोन गटात काल नरवणे (ता.माण) येथे चंद्रकांत जाधव यांच्या घरी झालेल्या मारामारीत चंद्रकांत जाधव व विलास जाधव या दोघांचा मृत्यू झाला. आज दोन्ही गटातील एकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सदर मारामारीत चंद्रकांत यांचा जागीच तर विलास यांचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. या मारामारीत अनेकजण जखमी झाले होते. लाकूड, लोखंडी पाईप, कुऱहाडी, चाकूने एकमेकांना भोसकण्यात आले. याबाबत दोन्ही बाजूकडून परस्पर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार दहिवडी पोलिसांनी नरवणे खून प्रकरणी आज पाच जणांना अटक केली आहे.
गुन्हा रजिस्टर नबंर 75 नुसार सुर्यकांत नाथाजी जाधव, कृष्णा प्रकाश तुपे यानां अटक केली आहे तर गुन्हा नबंर 76 नुसार कृष्णा धोडींबा जाधव, सागर शिवाजी जाधव व शिवाजी धोंडीबा जाधव यांना अटक केले आहे. सध्या नरवणेत सर्वत्र शांतता असून सर्व व्यवहार सुरळीत आहेत.