वारणानगर / प्रतिनिधी
स्वराज्य निर्मितीत छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवण्यासाठी प्रति शिवाजीचा वेश धारण करून स्वत्ताच्या प्राणाची आहूती दिलेल्या नरवीर शिवा काशीद यांचे पन्हाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या बुधवार पेठ ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांच्या स्मारकाची चार वर्षातील अतिवृष्टी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली आहे यासाठी निधी उपलब्द करून देण्याची मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर शाखेने आ. विनय कोरे यांना आज शनिवार दि. २६ रोजी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात मागील चार पाच वर्षामध्ये अतिवृष्टी व प्रशासनाचे दुर्लश झाल्यामुळे सदर स्मारकाचे अतिशय दूरवस्था झालेली आहे . पन्हाळा व शाहूवाडी मतदारसंघातील सर्व नाभिक समाज अविरतपणे तुमच्याबरोबर आहे . जिल्हयातील इतर राजकीय प्रतिनिधींना पन्हाळा आणि परिसरातील ऐतिहासीक गोष्टीबद्दल खुप गांभिर्य नाही . आजपर्यंत आपण छोट्या मोठ्या सर्व समाजासाठी काम करत आला आहात . शिवाकाशीद समाधी परिसराचे सुशोभिकरण हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता . हे कोल्हापूर जिल्यातील नाभिक समाज जाणून आहे.
आपण स्वामिनिष्ठ नरविर शिवा काशीद स्मारकाचे दुरावस्था सुरळीत करण्यासाठी,सुशोभिकरण यासाठी लागणारा शासकीय निधी उपलब्ध करून हे काम आपणच तडीस न्यावे अशी मागणी आ. विनय कोरे यांचेकडे नाभिक समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष सयाजीराव झुंजार,सरचिटणीस मारुती टिपुगडे, सुनील इंगळे, इचलकंजी शहर अध्यक्ष सरदार झेंडे ,रामभाऊ शिंदे, विनायक चव्हाण, अनिल संकपाळ ,दिनकर चव्हाण, विवेक रोकडे मयुर रोकडे संजय रोकडे, सचिन माने उपस्थित होते.