प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या कालावधीत बेळगाव जिल्हा पंचायतीने नरेगाअंतर्गत चांगली कामगिरी केली आहे. मे अखेरपर्यंत जिल्हय़ात एकूण 1,09,089 रोजगार निर्मिती करून संपूर्ण राज्यातच दुसऱया क्रमांकावर मजल मारली आहे. तर बळ्ळारी जिल्हा पंचायत 1 लाख 38 हजार रोजगार निर्मिती करून पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्हय़ातील एकूण 506 ग्राम पंचायतींपैकी 496 ग्राम पंचायतींमध्ये नरेगाअंतर्गत चाललेली कामे प्रगतिपथावर आहेत. मे अखेरपर्यंत बेळगाव तालुक्मयात 15 हजार 128 रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर सर्वाधिक कामे खानापूर तालुक्मयातील 50 ग्राम पंचायतींमध्ये झाली असून याठिकाणी 21 हजार 415 रोजगार निर्मिती करून देण्यात आले आहेत.
जून 1 पर्यंत जिल्हय़ातील रोजगार निर्मितीची संख्या सुमारे 1 लाख 25 हजार पर्यंत पोहोचली आहे. यामुळे लॉकडाऊनसारख्या संकटाच्या काळातच जिल्हा पंचायतीने नरेगाअंतर्गत जिल्हय़ातील कामगारांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिल्हय़ातील 506 ग्रा. पं. पैकी 496 पंचायतींमध्ये नरेगाअंतर्गत कामे प्रगतिपथावर आहेत. अथणी तालुक्मयातील 46 पैकी 44 ग्रा. पं. कार्य क्षेत्रात कामे सुरू आहेत. याबरोबरच बैलहोंगल तालुक्मयातील 34, चिकोडी व गोकाक तालुक्मयातील प्रत्येकी 36, हुक्केरी येथील 52 पैकी 51, कागवाड 9, कित्तूर 16, मुडलगी 20, निपाणी 27 पैकी 26, रामदुर्ग 37, रायबाग 38 पैकी 37 आणि सौंदत्ती विभागातील 45 पैकी 44 ग्राम पंचायत मध्ये नरेगाअंतर्गत कामे प्रगतिपथावर आहेत.