प्रतिनिधी/ सातारा
गटरचे काम अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनमध्ये गटराचे पाणी शिरत असून तेच अशुद्ध पाणी नागरिकांना पुरवठा होत ते काही केल्या बंद होत नाही. त्याबाबत वारंवार सातारा नगरपालिका, प्राधिकरण आणि बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या तरीही कोणीही लक्ष देईना अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, प्राधिकरणाच्या अभियंता श्रीमती चौगुले मोठे या बोलण्यात पटाईत. त्यांच्यापेक्षा विजय मेंगे परवडले पण या नकोत, श्रीमती मोटे मॅडमचा खोटेपणा उघड झाला असून त्यांनी काहीच कार्यवाही केली नसून त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शाहुनगर, गोडोली, जगतापवाडीसह शहराच्या पूर्व भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. या भागात सतत काही ना काही तक्रारी असतात. मात्र, बोलक्या स्वभावाच्या व कामात कुचराई करणाऱया अभियंता श्रीमती चौगुले-मोठे यांचे राजकीय वजन मोठे आहे. त्यांचे पतीराजही लघुपाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या प्राधिकरणाचे काम म्हणजे बैल गेला अन् झोपी गेला असेच सुरु आहे. त्याचाच शाहुनगर, जगतापवाडीकरांना वारंवार येतो आहे. जगतापवाडीतील नागरिकांना आळय़ासदृश्य पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून पुरवठा होत आहे. हे पाणी दुषित येण्याचे कारणही तसेच आहे. गटराचे काम अर्धवटर अवस्थेत असून ते तुंबलेल्या अवस्थेत आहे. त्याचे पाणी पिण्याच्या पाईपमध्ये शिरत असून आळय़ा, गांढूळही येतात. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या या संकटकाळत आणखी एखादी भयान साथ उदभवण्याची भिती असून त्या अनुषंगाने त्यांनी तसे निवेदन व फोनवरुन तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती केली होती. परंतु प्राधिकरणाच्या अभियंत्यांना पहायला वेळ नाही. बांधकाम विभागाला गटराचे काम का थांबले हे पहायला वेळ नाही तर पालिकेच्या आरोग्य विभागाचे वेगळेच काम आहे. त्यामुळे येथील नागरिक अक्षरशः वैतागले असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर अशुद्ध पाणीच जिल्हाधिकाऱयांना भेट देवून श्रीमती चौगुले-मोटे यांची बदली करण्याची मागणी करणार आहेत.
आम्ही असे पाणी कसे प्यायचे
गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्यात आळया येत आहेत. नळाचे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. हे पाणी किती दिवस असेच येत आहे. त्याबाबत तक्रारी करुनही त्याकडे प्राधिकरण पहात नाही. आम्ही आता कोणाकडे तक्रार करायची.
अनिता जगताप
प्राधिकरण,पालिका, बांधकाम विभागाने कार्यवाही करावी
अतिक्रमणे हटवली तर ते गटराचे काम होईल. गटरचे काम झाले तर पाण्याच्या पाईपमध्ये आळय़ा सापडणार नाहीत. परंतु शासनाच्या कार्यालयातील अनास्था दिसून येत आहे. मग ते पालिका असेल किंवा प्राधिकरण असेल किंवा बांधकाम विभाग असेल.
गणेश जगताप
श्रीमती चौगुले-मोटे या काहीच काम करत नाहीत
आम्ही कित्येकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्या श्रीमती चौगुले-मोठे यांच्याकडे केल्या होत्या. त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली नाही. गटराचे पाणी पाईपलाईनमध्ये शिरते आहे. त्याची साधी पाहणी करायला आल्या नाहीत. त्या बिनकामाच्या असल्याने त्यांची बदली करण्यात यावी व आम्हाला स्वच्छ पाणी देण्यात यावे.