प्रतिनिधी/ सातारा
जागतिक जलदिनाचे औचित्य साधुन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र केंडे, विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने येथील काही वसाहतींमध्ये ‘गळके नळ मुक्त शहर’ अभियान राबविण्यात आले. यावेळी ‘नळ गळती थांबवा पाणी वाचवा’ हा संकल्प ही करण्यात आला. तसेच विविध स्वयंसेवी संस्था शासन नियमांच पालन करून सहभागातून ‘एक कोटी लिटर पाणी वाचवा अभियान’ ही राबविण्यात आले. याअंतर्गत शहर परिसरातील 9 शाळांमध्ये गळणारे 19 नळ बदलण्यात आले. नळ सार्वजनिक असले तरी पाणी आपलेच आहे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व मुख्याध्यापक यांच्यासह हास्ययोग परिवार, विविध रोटरी क्लब, वसुंधरा स्वच्छता अभियान, मिलन मैत्री परिवार, शाहुपुरी ग्रामविकास आघाडी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्र सेवा दल व काही निवडक विद्यार्थी यांनीही या अभियानात सहभाग दर्शविला होता. तसेच अभियाना अंतर्गत शाळेला नळ देणगी स्वरूपात विनामुल्य देण्यात येत असुन त्यासाठी ‘नळ दान’ योजनाही राबविण्यात येत आहे. याअनुशंगाने शहरातील व उपनगरातील सुमारे हजार गळके नळ शोधून ते बदलले तर वर्षाला 365 कोटी लिटर पाणी वाचविण्याचे ध्येय साध्य होऊ शकेल असे राजेंद्र केंडे यांनी यावेळी सांगितले.