नवी दिल्ली/प्रतिनिधी
सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे ती पंजाबमधल्या राजकीय भूकंपाची! काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Former CM Captain Amarinder Sing) यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी नवज्योत सिंग सिद्धू (navjyot singh sidhu) यांनी देखील पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा (punjab congress presiden) राजीनामा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे पाठविला. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील (Congress) आपापसांत मतभेद आणि पराकोटीचे वाद असलेल्या या दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे पंजाबमध्ये अक्षरश: राजकीय उलथापालथ होतेय की काय असं दिसू लागलं. सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाब मंत्रिमंडळातील रझिया सुलताना यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही परिस्थिती अधिकच गोंधळाची झाली. राजीनाम्यानंतर या सर्व पार्श्वभूमीवर आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय गोंधळ सुरू असताना एकीकडे मुख्यमंत्री चरणजीत सिंग (Charanjit Singh Channi Chief minister of Punjab) यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे, तर दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील व्हिडीओ ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “१७ वर्षांचा माझा राजकीय प्रवास एका हेतूने होता. पंजाबच्या लोकांचं आयुष्य सुधारणं आणि मुद्द्यांच्या राजकारणावर स्टँड घेऊन ठामपणे उभं राहणं हाच माझा धर्म आहे”, असं ते म्हणाले.