सबजेल परिसरातील व्यापारी, नागरिक संतप्त : तातडीने रस्ता सुरू करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
वसंत मेडिकल ते बिंदू चौक सब जेल हा राजाराम रोड ऐन नवरात्रोत्सवात बॅरिकेट्स टाकून बंद करण्यात आल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. आधीच कोरोनामुळे गेली पावणे दोन वर्षे व्यवसाय ठफ्प झाल्याने व्यापारी हवालदील झाले होते. आता नवरात्रोत्सवातील सुरक्षेच्या नावाखाली रोड बंद करण्याचा जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा प्रकार म्हणजे स्थानिक व्यापारी, विक्रेत्यांच्या पोटावर उठण्याचा भाग असल्याची भावना व्यापारी, विक्रेत्यांनी व्यक्त केली. तातडीने रोड सुरू करण्यात यावा, वसंत मेडिकल जवळ लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटावावेत, पादचाऱयांना रस्ता खुला करावा, बिंदू चौकातील चारचाकी गाडय़ाचे पार्किंग पूर्ववत सुरू करावे, अशा मागण्या व्यापारी, नागरिकांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाव्दारे गुरूवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केल्या. निवासी उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनासंदर्भात स्थानिक व्यापारी व कोल्हापूर जनशक्तीचे पदाधिकारी समीर नदाफ यांनी सांगितले, पावणे दोन वर्षांनी नवरात्रोत्सव आनंदात साजरा होत आहे. प्रशासनाने नियोजन केले ओ. पण या नियोजनाचा फटका जुना राजवाडय़ाजवळील वसंत मेडिकल ते बिंदू चौक सबजेल या राजाराम रोडवरील व्यापारी, फेरीवाले, स्थानिक नागरिकांना बसत आहे. प्रशासनाने हा रस्ता दुतर्फा बॅरिकेट्स लावून बंद केल आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध प्रकारची दुकाने आहे. या दुकानांचा व्यवसाय पूर्णपणे अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱया भाविकांवर अवलंबून आहे. गेली दीड पावणेदोन वर्षे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या रोडवरील व्यापार, व्यवसाय पूर्णपर्ण मोडकळीस आा आहे. अनेक दिवस दुकानांना साधी बोहनी सुद्धा होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे व्यापारी हवालदील झाले आहेत. अशा परिस्थितीत नवरात्रोत्सवात मंदिर उघडण्याचा निर्णय झाल्याने व्यापाऱयांत उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांत माल भरला आहे. दुकाने ग्राहक, भाविकांसाठी सज्ज ठेवून ते व्यापार होण्याची प्रतीक्षा करत असताना राजाराम रोडच प्रशासनाने बंद केल्याने पुन्हा या रस्त्यावर लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या नियोजनाचा फटका आर्थिक कणा मोडलेल्या व्यापाऱयांना बसत आहेत. बहुतांश व्यापाऱयांनी कर्ज काढून माल भरला आहे. त्यामुळे राजाराम रोड तातडीने सुरू करण्याबरोबरच वसंत मेडिकल येथे असणारे बॅरिकेट्स हटविण्यात यावेत, बिंदू चौकातील चार चाकी गाडय़ाचे जे पार्किंग बंद केले आहे, ते तातडीने पूर्ववत करण्यात यावे, अशा आम्हा व्यापारी, नागरिकांच्या मागण्या आहेत, असे नदाफ यांनी सांगितले.