तीन महिन्यांत सात खून : पाच खुनांचा तपास लावण्यात यश : सुपारी गुन्हेगारांचा वापर, पोलीस दलासमोर आव्हान
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयात सध्या खुनांची मालिका सुरू आहे. चालू वर्षातील पहिले तीन महिने संपायला चार दिवस शिल्लक आहेत. या काळात सात खून झाले आहेत. खुनांच्या या मालिकेने बेळगावकरांना अस्वस्थ केले आहे. सातपैकी पाच खुनांचा तपास लागला आहे. अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार आदींबरोबरच अमलीपदार्थांच्या नशेतही खुनाचे प्रकार घडले आहेत.
गेल्यावषी काकती, मारिहाळ पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या अनेक खुनांचा तपास अद्याप लागला नाही. यावषीच्या पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या खून प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणांचा छडा लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आपल्या अधिकाऱयांवर तपासासाठी सतत दबाव आणत पाठपुरावा केल्यामुळे बहुतेक खुनांचा उलगडा झाला आहे.
कौटुंबिक वाद, जमीन वाद, आर्थिक व्यवहार, अनैतिक संबंध आदी कारणातून सुरू होणारी भांडणे व त्या भांडणाचे पर्यवसान खुनात झाले आहे. तर सुपारी गुन्हेगारांचा वापर करून व्यावसायिकाचा खून केल्याचाही प्रकार घडला आहे. तीन महिन्यांत घडलेल्या सहा खूनप्रकरणांवरून पोलीस दलाला आणखी सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे, हे अधोरेखित होते.
यावषीचे पहिले खूनप्रकरण माळमारुती पोलीस स्थानकात दाखल झाले. 2 जानेवारी रोजी महांतेशनगर येथील बसलिंगव्वा अदृश्य यम्मीनकट्टी (वय 29) या महिलेचा घरात मृतदेह आढळला. तिच्या गळय़ाला फास लावल्याचे वळ होते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद केली. शवचिकित्सा अहवालानंतर बसलिंगव्वाचा खून झाल्याचे उघडकीस आले. तिचा दीर मंजुनाथ (वय 32) याने तिचा खून केला होता. पंधरा दिवसांनी पोलिसांनी त्याला अटक केली. मोबाईल खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये दिले नाहीत म्हणून चार्जरने गळा आवळून तिचा खून करण्यात आला होता.
लगेचच 9 जानेवारी रोजी याच माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दुसरा खून उघडकीस आला. गांधीनगरजवळील मुचंडी गॅरेजनजीक नोहान नासीर धारवाडकर (वय 23) रा. रुक्मिणीनगर या रिक्षाचालकाचा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. प्रत्यक्षात 6 जानेवारीपासूनच तो बेपत्ता होता. त्याच्याच तीन मित्रांनी हा खून केल्याचे उघडकीस आले. त्यांना अटकही झाली आहे.
30 जानेवारी रोजी दुपारी कोंडसकोप, ता. बेळगाव जवळील हणमंतवारी परिसरात मानवी कवटी व सांगाडा आढळून आला. 35 ते 40 वषीय अनोळखी युवकाचा खून करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी जाळून टाकल्याचे उघडकीस आले आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या खुनाची नोंद झाली आहे. अद्याप हा सांगाडा कोणाचा, याचा उलगडा झाला नाही.
27 फेब्रुवारी रोजी बेळगुंदी येथील रिअल इस्टेट व्यावसायिक गजानन बाळाराम नाईक (वय 52) याचा खून झाल्याचे उघडकीस आले. घरात एकटाच असताना तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. गजाननच्या प्रेयसीसह तिचा मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.
गवत्गंजीत घालून युवकाला पेटविले
रेणुकानगर येथील शेतवडीत गवतगंजीत घालून एका युवकाला पेटविण्यात आले होते. पोलिसांनी 2 मार्च रोजी जळालेला मृतदेह ताब्यात घेतला होता. मृतदेहाची ओळख पटविणेही कठीण होते. अशा परिस्थितीत सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये सापडलेल्या सुगाव्यावरून कणबर्गी येथील परशराम कुरबर (वय 35) या युवकाला अटक केली आहे. खून झालेल्या संतोषच्या पत्नीशी परशरामचे अनैतिक संबंध होते. याच कारणावरून त्याचा खून झाला. या प्रकरणाचाही छडा लावण्यात आला.
त्यानंतर घडलेल्या सुपारी खुनाने संपूर्ण शहर हादरले. 15 मार्च रोजी सकाळी राजू मल्लाप्पा दोड्डबोम्मण्णावर या रिअल इस्टेट व्यावसायिकाची कार अडवून त्याच्या डोळय़ात मिरचीपूड टाकून त्याचा भीषण खून करण्यात आला. भवानीनगर, मंडोळी रोड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी त्याची पत्नी व दोन व्यावसायिक भागीदारांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. संजय रजपूत याला दहा लाखांची सुपारी देऊन राजूचा व्यावसायिक कारणातून काटा काढण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
किल्ला तलावाजवळ कौटुंबिक वादातून खून
त्यानंतर 25 मार्च रोजी किल्ला तलावाजवळ भर रस्त्यात हिनाकौसर मंजूरइलाही नदाफ (वय 29) या महिलेचा तिच्या पतीनेच खून केला. खुनानंतर कितीतरी वेळ मंजूरइलाही आपल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ उभा होता. गर्दीतील नागरिकांना आपण खून का केला? याची माहिती देत होता. माळमारुती पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा खून झाला आहे.
माजी जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांचा आदर्श
यापूर्वी संदीप पाटील हे बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख असताना जिल्हय़ातील खुनाचे प्रमाण घटविण्यासाठी त्यांनी नवीन उपक्रम हाती घेतला होता. कौटुंबिक वाद, आर्थिक वाद, जमीन वादात पोलीस स्थानकात येणाऱयांची समजूत घालून प्रसंगी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात होती. तशी सूचनाच त्यांनी आपल्या अधिकाऱयांना दिली होती. जेणेकरून खुनासारखे गंभीर पाऊल कोणी उचलू नये म्हणून त्यांच्यावर पोलिसांची जरब असायची. आता पोलीस दलात नवे प्रयोग जवळजवळ बंद झाले आहेत. बेळगावची नोकरी म्हटली की अधिकाऱयांची पुढची पिढी बसून खाईल इतका पैसा कमवायचा, हेच अनेकांचे टार्गेट बनले आहे. पैशासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणाऱया अधिकाऱयांचीही काही कमतरता नाही. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना अशा अधिकाऱयांविरुद्ध कठोर पावले उचलावीत लागणार आहेत. नपेक्षा कोणाचा मुडदा पाडायचा आहे तर बेळगावला या, अशीच जनसामान्यांची समजूत होईल.