बेळगाव : / प्रतिनिधी
नवीन रेशनकार्ड बनविण्याचे काम गेल्या चार-पाच महिन्यांपासून बंद झाल्याने सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. परिणामी गोरगरीब जनतेला रेशनबरोबर अनेक शासनाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे ठप्प झालेले रेशनकार्डचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सर्वसामान्यांतून जोर धरून आहे.
शहरातील अशोकनगर, गोवावेस, रिसालदार गल्ली, टीव्ही सेंटर आदी ठिकाणी बेळगाव वन कार्यालये आहेत. या कार्यालयांतून जे÷ नागरिक कार्ड, आधारकार्ड, आयुषमान भारत आदी कागदपत्रांबरोबर नवीन रेशनकार्डची पुर्तता केली जाते. मात्र गेल्या पाच महिन्यापासून रेशनकार्डचे काम ठप्प झाल्याने चांगलीच गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांना कार्यालयात येऊन रेशनकार्डच्या कामाअभावी माघारी परतावे लागत आहे. आधीच नागरिक कोरोनाच्या संकटात सापडले आहेत. त्यातच रेशनकार्डचे काम स्थगित झाल्याने अनेकांना दर महिना मिळणाऱया रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. अगामी काळात ग्राम पंचायत निवडणुका लागल्यास पुन्हा रेशनकार्ड बनविण्याच्या कामाला स्थगिती येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नवीन रेशनकार्डच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे. शासकीय कामाबरोबर इतर कोणत्याही कामासाठी आधारकार्ड व रेशनकार्ड महत्त्वाचे आहे. त्यासाठी रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिक बेळगाव वन व कर्नाटक वन कार्यालयाच्या पायऱया झिजवत आहेत. इतर शासकीय कागदपत्रांची कामे सुरळीत सुरू असली तरी रेशनकार्डचे काम स्थगित झाल्याने नागरिकांची शासकीय कामे थांबली आहेत. त्यामुळे रेशनकार्डच्या कामाला चालना द्यावी, अशी मागणी होत आहे. कर्नाटक वन केंद्रात नवीन आधारकार्ड बनविणे यासह नावात बदल करणे, पत्त्यात बदल करणे, मोबाईल क्रमांकामध्ये बदल करणे आदी कामे सुरू आहेत. मात्र रेशनकार्ड सुरू करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक जण रेशनकार्ड सुरू होण्याच्या