‘हॉलिडे’ची यादी जाहीर : लॉकडाऊननंतर प्रथमच पर्यटक बाहेर
प्रतिनिधी / निपाणी
कोरोनाच्या कटू आठवणींसह हे वर्ष मावळतीला आले आहे. नवीन वर्षारंभ होण्यासाठी केवळ आठवडा शिल्लक आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या प्रशासन विभागाने 2021 वर्षातील 19 सार्वजनिक सुटय़ा जाहीर केल्या आहेत. वर्षभरातील 52 रविवार व तेवढेच शनिवार यासह जिल्हाधिकाऱयांमार्फत जाहीर पाच सुटय़ा, दिवाळीच्या सुटय़ा अशा एकूण 125 दिवस म्हणजे तब्बल चार महिन्यांच्या सुटय़ांची नवीन वर्षात चाकरमान्यांना पर्वणी राहणार आहे.
राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने रविवारी व शनिवारी सुटी असते. त्यामुळे शनिवार व रविवार म्हटले की कर्मचाऱयांसाठी आठवडय़ात कार्यालयीन कामापासून सुटकेचे दिवस असतात. या दिवसांत छंद जोपासत विरंगुळा मिळविण्याचा बहुतांश जणांकडून प्रयत्न होत असतो. अनेकजण घरातील कामे पूर्ण करतात तर काहीजण सुटीचा दिवस मौजमजेत घालवून आनंद घेतात. त्यामुळे शनिवार-रविवार हे कर्मचाऱयांचे आवडीचे दिवस असतात. याशिवाय सण, उत्सव, राष्ट्रीय सण व स्थानिक प्रशासनाच्या सुटीकडे कर्मचाऱयांचे विशेष लक्ष असते. कार्यालयीन सुटय़ांचा ताळमेळ बसवून शासकीय सुटय़ांचा आनंद घेण्याचा प्रयत्नही अनेक जणांकडून आवर्जून होतो.
यंदा रविवारी पाच सुटय़ा आल्याने शासकीय कर्मचाऱयांचा हिरमोडही झाला आहे. सलग तीन दिवस सुटय़ा अशा नव्या वर्षाची सुरुवात शुक्रवारने होणार असून, प्रजासत्ताकाची वर्षातील पहिली शासकीय सुटी 26 जानेवारीला मिळणार आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. या दिवशी शुक्रवार असल्याने त्यानंतर शनिवार, रविवार अशा सलग तीन सुटय़ा मिळणार आहेत. 29 मार्चला होळीची सुटी सोमवारी आल्याने यामध्येही तीन दिवस सलग सुटी मिळणार आहे.
याशिवाय दोन एप्रिल, सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी व ऑक्टोबरमध्ये दसरा शुक्रवारी आल्याने तेव्हाही सलगच्या सुटय़ांचा आनंद सरकारी कर्मचाऱयांना मिळणार आहे. दिवाळीच्या सणामध्ये सरकारी कर्मचाऱयांची चांगलीच दिवाळी साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मीपूजन गुरुवारी, बलिप्रतिपदा शुक्रवारी व पुढील दोन दिवस असे चार दिवसांची सुटी सलगपणे उपभोगता येणार आहे. त्याच महिन्यामध्ये गुरुनानक जयंतीची सुटीही शुक्रवारीच आहे.
काळजी घेण्याचे आवाहन…
कोरोनाने वाईट गेलेले 2020 वर्ष हे कोरोनाच्या प्रभावाने अत्यंत भीतीचे व त्रासदायक गेले. त्यामुळे नवीन वर्षतरी ताण-तणावापासून मुक्त असावे, यासाठी अनेकजण नियोजन करीत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱया लाटेची शक्मयता व्यक्त होत असली तरी अजूनही जिल्हय़ासह राज्यामध्ये त्याचा प्रभाव दिसत नसल्याचे चित्र आहे. तरीही अजूनही भीती गेलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 2020 मध्ये 22 मार्चपासून आजपर्यंत राज्यातील नागरिक कोरोनाच्या दहशतीखाली असल्याने मनसोक्त जगता आले नाही. पण, येणारे वर्ष आनंदाने घालविण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे.