आधारकार्ड काढण्याच्या केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे
प्रतिनिधी/ बेळगाव
आधार कार्ड आता प्रत्येक योजनेसाठी महत्वाचे ठरु लागले आहे. आधारकार्डचे काम नित्य सुरु आहे. कारण आधारकार्डमध्ये झालेल्या चुका दुरुस्ती करण्यासाठी नेहमीच धावपळ करावी लागत आहे. यावषी जवळपास 3 लाखांहून अधिक जणांनी नव्याने नोंदणी केली. आतापर्यंत 53 लाखहून अधिक जणांनी आधार नोंदणी केली आहे. मात्र त्यामधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. यामुळे आधारकेंद्रांसमोर अजूनही गर्दी दिसतच आहे.
बेळगाव जिह्यामध्ये 2018 पर्यंत 50 लाख 68 हजार 621 आधारकार्डची नोंद झाली होती. 2015 च्या लोकसंख्या गणतीप्रमाणे 100 टक्के ही योजना यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता पाच वर्षांच्या बालकांना आधारकार्ड काढावे लागत आहे. त्यामुळे या आकडेवारीमध्ये दरवषीच वाढ होत चालली आहे. नव्याने वर्षभरामध्ये 3 लाखांहून अधिक जणांनी आधारकार्ड काढले आहे. जुन्या तहसीलदार कार्यालयातील आधार केंद्र बंद करण्यात आले आहे. आता काही बँकांच्या ठिकाणी तसेच बेळगाववनमध्येही आधार काढुन दिले जात आहे. या केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे आधारकार्डसाठी ताटकळत थांबावे लागत आहे.
पाच वर्षांखालील काही बालकांची आधारकार्ड काढण्याचे काम सुरु आहे. तर राहण्याचा पत्ता बदल, नावामध्ये झालेली चूक दुरुस्त करणे तसेच जन्म तारीखेमध्ये झालेला बदल याचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. संगणक युगामध्ये आधार कार्डची स्थिती जाणून घेणे प्रत्येकाला शक्मय आहे. आधारकार्ड काढल्यानतर आपल्या आधारकार्डची स्थिती सरकारी वेबसाईटवर गेल्यानंतर सहज उपलब्ध होवू शकते.
मोबाईल तसेच बँकेच्या खात्याला सध्या आधारलिंक सुरु आहे. त्यामुळे आपली संपूर्ण माहिती या वेबसाईटवर मिळू शकते. ज्या ठिकाणी आपण आधारलिंक करतो त्या विभागाचे नाव तसेच कशासाठी लिंक केले? ही सर्व माहिती मिळू शकते. बायोमेट्रीक असल्यामुळे आता ही माहिती स्वतःला मिळत आहे. पण आधार बाबतची थोडीशी गोपनियता बाळगणे हिताचे ठरणार आहे. आधारकार्डच्या माहितीमुळे अधिक गैरप्रकार घडत नसला तरी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आधारकार्डची अधिक माहिती देणे धोक्मयाचे ठरू शकते. त्यासाठी सहजासहजी कोणालाही आधारकार्ड देवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आता आपली मालमत्ताही आधारलिंक होवू लागली आहे. शेतीचा सातबारा उतारासुध्दा आधारलिंक होत आहे. याचबरोबर यापुढे आपली घरे किंवा इतर मालमत्ता हे देखील आधारलिंक केली जात आहे. तेंव्हा आधारकार्डहे महत्वाचे आहे. तेंव्हा प्रत्येकाने आधारकार्ड काढुन घेणे गरजेचे आहे. काही दुरुस्ती असल्यास त्या दुरुस्तीही करुन घेणे हिताचे असून प्रत्येकाने आपले आधारकार्ड अपडेट ठेवणे महत्वाचे आहे. बऱयाचवेळा नोकरीसाठी सीमाभागातील नागरिक महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यामुळे महाराष्ट्रातील आधारकार्डमध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये उल्लेख केलेला आहे. कर्नाटकात येताच तो कन्नडमध्ये आणि इंग्रजीमध्ये उल्लेख होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक कागदपत्रे देवून त्यामध्ये बदल करुन घेणे गरजेचे अन्यथा हे आधारकार्ड कर्नाटकातील मिळणाऱया योजनांसाठी अडचणीचे ठरु शकते.