गेल्या 24 तासांत 41 हजार नवे बाधित, 507 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 507 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी दिवसभरात 38 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 42 हजार 015 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
देशात कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 9 हजार 394 इतके सक्रिय रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 57 हजार 720 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 कोटी 4 लाख 29 हजार 339 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
एकंदर आकडेवारीनुसार देशाचा मृत्यूदर सध्या 1.31 टक्क्मयांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्मयांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 1.30 टक्के आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात सातव्या स्थानी पोहोचला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱया स्थानी आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 21 जुलैपर्यंत देशभरात 41 कोटी 78 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात 22 लाख 77 हजार लसीचे डोस देण्यात आले. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 9 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी दिवसभरात 17 लाख 18 हजार कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या असून पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्के इतका आहे.