दिवसभरात जवळपास 33 हजार नवे रुग्ण, 35,909 जणांना डिस्चार्ज, 417 बळी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचे संकट पूर्णपणे नियंत्रणात आले नसले तरी देशात कोरोना प्रादुर्भावात काहीशी घट झाली आहे. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने देशात सर्वांची धास्ती वाढवली आहे. अशातच तज्ञांकडून देशात तिसऱया लाटेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारच्या चोवीस तासात 32 हजार 937 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान देशात गेल्या 24 तासांत 35 हजार 909 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 81 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात 32 हजार 937 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी 28 हजार 204 बाधितांची नोंद करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 22 लाख 25 हजार 513 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 31 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 11 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवी समस्या निर्माण झालेली आहे. देशातील कोरोना संकट अद्यापही कायम आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने सध्या देशात सर्वांची धास्ती वाढवली आहे. अशातच तज्ञांकडून देशात तिसऱया लाटेचा इशारा देण्यात आला आहे.