वन आणि पर्यावरण मंत्रालयाने घेतला निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेतून चित्त्यांना आणण्याची योजना 5-6 महिन्यांसाठी लांबणीवर पडली आहे. आता पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत चित्त्यांना आणले जाणार आहे. तर याआधी नोव्हेंबरमध्येच दक्षिण आफ्रिकेतून पहिल्या खेपमध्ये 10-12 चित्ते आणले जाणार होते. मध्यप्रदेशच्या कूनो पालपूर अभयारण्य आणि परिसरातील क्षेत्रांमधील तयारी पूर्ण न झाल्याने वन तसेच पर्यावरण मंत्रालयाने चित्त्यांना आणण्याची योजना लांबणीवर टाकली आहे.
या चित्त्यांना मध्यप्रदेशातील कूनो पालपूर अभयारण्य आणि तेथील क्षेत्रांमध्येच ठेवण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे तेथील तयारी पूर्ण होऊ शकलेली नाही. पाऊस ओसरल्यावर तयारीला वेग देता येणार असल्याचे या योजनेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेत हिंसा
याहून मोठे कारण दक्षिण आफ्रिकेतील अलिकडेच भारतीय समुदाय आणि स्थानिक लोकांदरम्यान झालेल्या हिंसक घटना देखील आहे, यामुळे तेथे भारतीयांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत चित्त्यांना आणण्यास विरोध देखील होण्याची शक्यता होती. दक्षिण आफ्रा प्रशासनाने देखली या योजनेला काही काळासाठी लांबणीवर टाकण्याची सूचना केली होती.
30-35 चित्यांना आणणार
देशात चित्त्यांना वसविण्याच्या योजनेच्या अंतर्गत पहिल्या खेपमध्ये दक्षिण आफ्रिकेतून सुमारे 10-12 चित्त्यांना आणले जाणार आहे. त्यांना सर्वप्रथम इनक्लोजरमध्ये (कुंपण) ठेवले जाईल. सध्या योजनेच्या अंतर्गत 30-35 चित्त्यांना आणण्यात येईल. यांतर्गत नोव्हेंबरपर्यंत चित्यांची पहली खेप आणण्याची योजना होती.
3-4 अभयारण्यांची निवड
चित्त्यांना आणण्यापूर्वी भारतीय वन्यजीव तज्ञांचे एक पथक सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होते. कूनो पालपूरसोबतच देशातील 3-4 आणखीन अभयारण्यांमध्ये चित्त्यांना ठेवण्यात येणार आहे. यात मध्यप्रदेशातील नौरादेही आणि राजस्थानचे भैंसरोडगड अभयारण्य देखील सामील आहे.