प्रतिनिधी / नांद्रे
कोरोनाच्या दुसर्या लाटेत नांद्रे गावात रूग्ण संखेत दिवसेदिवस झपाट्याने वाढ होत आसून आजमितीला 31 पॉझिटिव्ह रूग्ण हे अॅक्टिव्ह असून दररोज 2 ते 3 नवीन पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत.त्यामुळे ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव,तलाठि यांच्या यंञणेच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निमाण झाले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाट सुरू झाल्यापासून व्यवस्थापन समितीचे सचिव,तलाठी हे ” ब्रेक द चेन” या शासनाच्या संकल्पनेतून आऊटऑफ रेंजमध्ये आहेत. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या सचिवाचे ‘ बडा घर पोकळ वासा’ आशी स्थिती झालीआहे. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सचिवामुळे ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कारभाराच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत.
गावातील महापूराच्यावेळी,व सध्या कोरोना काळात वंचितांची कैफियत महसूल व व्यवस्थापन समितीचे सचिव, तलाठी यांची कारभाराची पोस्टमॉर्टमची गरज आहे.
या कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंन्द्रातील डॉक्टर,व सव सेवकवग,रूग्णवाहिका चालक,आशा स्वंयसेविका, अंगणवाडी सेविका, सफाई सेवक, पाणी पुरवठा, विधुत विभाग, खाजगी डॉक्टरस, मेडिकल, ग्रामपंचायत सेवक, सर्व अत्यावश्यक सेवा पुरवणारे, लोकप्रतिनिधी, नेते, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, आदि प्रामाणिकपणे आहोरात्र जनतेची सेवा देत आहेत.
बेजबादार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात कारभार
ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीचा कारभार हा सचिव म्हणून तलाठी यांच्याकडे आहे. अत्यंत बेजबाबदार अन् असंवेदनशील अधिकारी म्हणून यांची ख्याती तयार झाली आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्यांना न विचारता या महाशयाचा कारभार सुरू आहे. यांच्या मनमानी व नियोजन शून्य कारभारामुळे लोकांच्या आरोग्याचे बारा वाजले आसून कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तलाठी यांच्या कार्यपध्दतीबाबत अनेक गोरगरिबांना शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहवे लागले असून अनेक बोगस लाभार्थींना लाभ झाल्याने अनेकांनी खाजगीत त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या संकटाचे गांभीर्य लक्षात घेत महसूल व ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीला एक चांगला व कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज गावाला आहे.