ऑनलाईन टीम / कोलकाता :
नागरिकत्व कायदा हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही. तर तो नागरिकत्व देणारा आहे. काही समाजकंटकांकडून नागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
कोलकात्यातील बेलूर मठाला भेट देऊन आज मोदींनी स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते बोलत होते.
मोदी म्हणाले, नागरिकत्व कायदा एका रात्रीत तयार झालेला नाहे. विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक या कायद्याबाबत तरुणांच्या मनात अफवा पेरल्या जात आहेत. नागरिकत्व कायदा हा नागरिकत्व देणारा आहे. तो कोणाचेही नागरिकत्व हिरावणारा नाही. फाळणीमुळे ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला पाहिजे, असे महात्मा गांधींसह इतर मोठय़ा नेत्यांना वाटत होते. त्यामुळे तरुणांनी या कायद्याबाबचा गैरसमज दूर करावा.