प्रतिनिधी / असळज
कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आपले यश आहे असे प्रतिपादन कोल्हापूर राष्ट्रवादीचे जिल्हाकार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी व्यक्त केले ते शेणवडे ता. गगनबावडा येथील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना नागरिकांच्या समस्या सोडवत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मार्गदर्शन केले. यावेळी गगनबावडा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उत्साही सामाजिक कार्याची माहिती दिली. त्याचबरोबर गट वाढीसाठी केलेल्या कामाची माहिती दिली.
यावेळी पदाधीकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सेवादल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सहकार सेल जिल्हाध्यक्ष देसाई सर, शेणवडे सरपंच सखाराम कांबळे, शब्बीर नाचरे, अनिल लटके, किसान वापीलकर, संदीप पाटील, बबन पाटील, डॉ.युवराज पाटील, प्रवीण गावकर, दिपक पाटील, कृष्णा चिले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार तालुका उपाध्यक्ष भिवाजी वरेकर यांनी मानले.