प्रतिनिधी/ रत्नागिरी
कारोना चाचणीसाठी लोक स्वतःहून पुढे येत नसल्याने काराना चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याचे जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े शासनाकडून राबवण्यात येणाऱया माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा देखील सकारात्मक परिणाम दिसून येत आह़े त्याचप्रमाणे लोकांमध्ये कारोनाशी मुकाबला करण्याची रोगप्रतिकार शक्ती देखील निर्माण झाल्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आली आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून रविवारी केवळ 118 तपासण्या करण्यात आल्या होत्य़ा यामध्ये 38 रूग्ण कारोनाबाधित असल्याचे समोर आले होत़े तर शनिवारी 264 कोरोनाच्या चाचण्या झाल्या होत्या, यामध्ये 65 कोरोनाबाधित रूग्ण मिळून आले होत़े मागील दोन दिवसांची आकडेवारी पाहता बऱयाच अंशी कोरोना चाचण्या कमी झाल्याचे दिसून येत आह़े त्याचप्रमाणे रूग्णांचे प्रमाण देखील घटले आह़े ही सकारात्मक बाब रत्नागिरी जिह्यासाठी असल्याचे बोलले जात आह़े
दरम्यान शासनाकडून ‘माझे कुटुंब, माझी जाबाबदारी’ ही मोहिम राबविली जात आह़े या मोहिमेतून आशा वर्कर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी घरोघरी जावून थर्मल स्क्रिनींग व ऑक्सीमीटर चेक करत आहेत़ यातून संशयित आढळणाऱया रूग्णांची तात्काळ तपासणी करण्यात येत आह़े यामुळे कारोनाचाचणी करण्यासाठी कमी प्रमाणात रूग्ण येत असल्याचे जिल्हा रूग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े
जिह्यामध्ये लोकांमध्ये कारोनाविरूद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती निर्माण होत आह़े तसेच कारोना चाचणी करण्यासाठी येणाऱया रूग्णांचे प्रमाण देखील कमी झाले आह़े यामुळे कारोनाच्या चाचण्यांमध्ये घट झाली असून रूग्णांचे प्रमाण देखील कमी झाले आह़े – ड़ॉ संघमित्रा फुले (प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक)