प्रतिनिधी/ सातारा
नागरिकांनी आपल्या व्यक्तीगत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहेच तथापि सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून, नागरिकांनी केवळ घंटागाडीतच आपला कचरा टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य राखण्यास मदत होणार आहे. नगरपरिषदेला देखिल कचरा वाहुन नेणे सोयीस्कर होणार आहे. तथापि आजही अनेक नागरीक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. कोणाही नागरिकांनी आपला कचरा उघडय़ावर, सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास, अशा नागरिकांना जबर दंडाची शास्ती लावली जाईल, नागरीकांनी आपला कचरा घंटागाडय़ाशिवाय कोठेही अन्यत्र टाकु नये, असे आवाहनवजा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.