प्रतिनिधी / अक्कलकोट
येथील नागुर ता. अक्कलकोट तांड्यावरील तुरकाट्यांच्या सरपणाला मंगळवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत चार घरातील प्रापंचिक साहित्य, धान्य, आदी जळुन अंदाजे एक लाख चौ-यानऊ हजार रूपयाचे नुकसान झाले. याची दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असुन याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की,
जळणासाठी ठेवलेल्या तुराटी काट्यांनी पेट घेतला. तीन अग्निशामक वाहनाच्या साहाय्याने दीड तासात आग विजवण्यात यश आले. यासाठी ग्रामसुरक्षा समितीने योगदान दिले. पोलीस पाटील मिनाली किगणी हिने फिर्याद दिली. घराचे भोवती, घरामागे सदरील वस्तीवर सोईच्या ठिकाणी जळणासाठी तुरकाट्यांचा साठा केला होता. फोन वरून आगीची माहिती मिळाल्याने पोलीस पाटील हिने तातडीने पोलीस व महसुल विभागाला कळविले. तुरीचे काटक्यांना मोठी आग लागलेली होती. लोक आग विझवून घरातील साहिल्या बाहेर काढत होते. वरच्या बाजूला असलेल्या ३ से ४ घरांना आगीने झळ पोहोचली व त्याच्या पाठीमागे सर्व रस्त्यावर काटक्या होत्या. दुधनी नगरपरिषद, अन्नछत्र मंडळ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या तीन अग्निशामक वाहनांनी आग विझवली. यामध्ये देविदास फुलचंद राठोड यांचे भांडी, कपाट, टिव्ही, पत्रे असे मिळुन एक लाख चाळीस हजार रूपयाचे साहित्य जळुन खाक झाले. निंबांची खुब्बु जाधव यांचे घरातील टिव्ही, पंखा, कपडे, कुलर,घराचे खिडके जळुन २२ हजार रूपयाचे नुकसान झाले. शंकर रामू चव्हाण यांचे घराचे खिडकी, भांडे जळून बारा हजार रूपयाचे नुकसान झाले तर सुरेश धनसिंग राठोड यांच घरातील भांडी, कपडे, धान्य जळुन झालेले २० हजार रूपयाचे नुकसान झाले.असे एकुण चार घरांचे मिळुन एक लाख ९४ हजार रूपयाचे नुकसान झाले. आगीचे कारण माहित नसुन वा-यामुळे आग पसरली. सावन देविदास राठोड या मुलाने त्याच्या घरातील समयसुचकतेने गँस सिलेंडर वेळेत बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. घटनास्थळाला तातडीने पोलीस निरीक्षक प्रदिप काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे आदीसह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.अधिक तपास पोलीस करत आहेत.