प्रतिनिधी /वाळपई
सत्तरीत आलेल्या पुरामुळे नाणूस बेतकेकरवाडा येथील गोशाळेतील जवळपास 150 गुरे दगावण्याचा प्रकार घडल्यानंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी सकाळी गोशाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत गोशाळेच्या व्यवस्थापनाने समाधान व्यक्त करून सरकारने या गोशाळेसाठी आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी केली आहे.
पुराच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे नाणूस येथे कार्यरत असलेल्या गोशाळेतील जवळपास 150 गुरे दगावली तर जवळपास 100 पेक्षा जास्त गुरे पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे गोशाळेच्या इतर साधनसामुग्रीची मोठी हानी झालेली आहे. नुकसानीचा आकडा जवळपास पंधरा लाखांच्या आसपास जाण्याची शक्मयता वर्तविण्यात आली. दरम्यान श्रीपाद नाईक यांनी सोमवारी एकूण संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली व त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत शक्मय तेवढे पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपस्थित असलेले व्यवस्थापन समितीचे लक्ष्मण जोशी यांनी एकूण संपूर्ण गोशाळेच्या नुकसानी संदर्भाची सविस्तर माहिती मंत्री नाईक यांना दिली.