प्रतिनिधी/ बेळगाव :
शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महापालिकेने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, न्यू गुड्सशेड रोड येथील नाल्यामधील विद्युतवाहिन्या आणि जलवाहिन्या हटविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जोराच्या पावसात नानावाडी परिसरातील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्मयता आहे.
नाल्यातील अडथळे आणि विविध ठिकाणी साचलेल्या कचऱयामुळे मागील वषी विविध भागात नाल्यातील पाणी घरांमध्ये शिरले होते. नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. विशेषत: मराठा कॉलनी, नानावाडी परिसर, महात्मा गांधी कॉलनी आणि इंद्रप्रस्थनगर आदी भागात पाणीच पाणी झाले होते. येथील काही नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित करण्यात आली नव्हती. नाल्यात असलेल्या जलवाहिन्या, विद्युतवाहिन्या आणि कचऱयामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे यंदा पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नाला स्वच्छता मोहीम जोरदारपणे चालविली होती. नाल्यामधील अडथळा हटवून स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. काँग्रेस रोडशेजारी आणि मराठा मंदिरशेजारी नाल्यामध्ये असलेल्या जलवाहिन्या, विद्युतवाहिन्या हटविण्यात आल्या आहेत. पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र न्यू गुड्सशेड रोड परिसरातून वाहणाऱया नाल्यामधील विद्युतवाहिन्या, जलवाहिन्या आणि मोबाईल केबल हटविण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रेल्वे ट्रकच्या खाली असलेल्या पुलाची स्वच्छता करण्यात आली नाही. सदर नाल्यामधून नानावाडी परिसरातील पाणी वाहत असते. या ठिकाणी साचलेल्या कचऱयामुळे नानावाडीमधून येणाऱया पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी नानावाडी परिसरात पूरस्थिती निर्माण होऊन घरांमध्ये पाणी शिरते. दरवषी मराठा कॉलनी आणि नानावाडी परिसरातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे. पण निर्माण झालेल्या परिस्थितीचे निवारण करण्याकडे मनपा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. न्यू गुड्सशेड रोड परिसरातून वाहणाऱया नाल्यामध्ये पाचहून अधिक मोबाईल केबल व विद्युत वाहिन्या आहेत. दीड फूट आकाराची डेनेजवाहिनी नाल्याच्या तोंडावर आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा साचत असून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. रेल्वे मार्गाच्या खाली कचरा साचला असून, या ठिकाणी विविध वाहिन्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा अडथळा कधी हटविणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. नाल्यामधील अडथळा हटविण्यासाठी येथील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या, पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डेक्कन हॉस्पिटलसह परिसरात पाणी शिरत आहे. परिसरातील रहिवाशांना येथील समस्येचा सामना करावा लागत आहे. नानावाडी परिसरातील नागरिकांनादेखील याचा फटका बसत आहे.