ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेने नाना पाटेकर हे दुसरे आसाराम बापू असल्याची टीका अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात एका चित्रपटाच्या शुटींगवेळी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दहा वर्षांपूर्वी तक्रार दाखल केल्यानंतर नाना पाटेकर यांचे वकील ऍड. पावसकर हे स्वतःहूनच मला भेटले आणि त्यांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिले. पावसकर हे नाना पाटेकरांचे अनेक वर्षांपासूनचे वकील आहेत. ती बाब त्यांनी माझ्यापासून लपविली. त्यांनी या केस संदर्भातील सर्व मूळ कागदपत्रे, चित्रपटाच्या कंत्राटांच्या प्रती माझ्याकडून काढून घेतल्या. त्यानंतर माझी फसवणूक करण्यात आली, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे.
नाना पाटेकर यांच्याकडून माझा चित्रपटाच्या शुटींगवेळी विनयभंग झाला असतानाही बॉलीवूडमधील लोक माझीच बदनामी करत आहेत. त्यामुळे माझे करिअर संपुष्टात येत आहे, असेही तनुश्रीने म्हटले आहे.
नाना पाटेकर यांच्याविरोधात या प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी एफआयआर दाखल आहे. मात्र, तनुश्रीच्या आरोपांत तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे.