केतन पिलणकर/ रत्नागिरी
निसर्ग वादळाचा फटका, अतिवेगवान वारे व अतिवृष्टीमुळे किनारपट्टीवरील नारळ उत्पादक शेतकऱयांचे नुकसान झाले आह़े मागील काही दिवसांमध्ये नारळाच्या उत्पादनात सुमारे 60 टक्के घट झाली असून शासनाने नारळ बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
जिह्यात शेतकऱयांना बारामाही हुकुमी उत्पन्न देणारे पीक म्हणून नारळाकडे पाहिले जात़े जिल्हय़ात नारळ पीकाखाली 5212 हेक्टर क्षेत्र आह़े निसर्गचक्रीवादळाचा मोठा तडाखा दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यातील नारळांना बसल़ा अन्य तालुक्यांना ‘निसर्ग’चा थेट फटका बसला नसला तरीही एकूणच लहरी हवामानामुळे नारळ उत्पादनाचे प्रमाण घटले आह़े पावसाळ्यातील वेगवान वारे, अतिरिक्त पावसामुळे नारळाच्या शेंडय़ावर, सुक्ष्म जखमा झाल्या आहेत़ जोरदार वाऱयांमुळे नारळाच्या झाडाचे अवशेष तुटल्यामुळे खोड, झावळीसह देठांवर जखमेचे व्रण आहेत़ यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आह़े निसर्गामुळे जिह्यातील नारळ बागायतीचे 220 हेक्टरचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
माडीचे प्रमाणही अल्प
जिल्हय़ामध्ये नारळापासून माडी काढली जात़े टाळेबंदीमुळे मागणी कमी व उत्पादनात झालेल्या घसरणीमुळे शासनमान्य माडी दुकानात माडीही महागली आह़े एकूणच निसर्ग वादळ व अतिवृष्टीमुळे नारळ उत्पादक शेतकऱयाचे आर्थिक गणितच कोलमडले आह़े
किटकांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी चक्रीवादळामुळे उत्पादनात घट झाली आह़े त्याचबरोबर उंदीर व अन्य किटकांच्या प्रादुर्भावामुळेही उत्पादन घटले आह़े