मुंबई/प्रतिनिधी
नारायण राणे सध्या महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. मुंबईतून या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली होती. सोमवारी रायगडमधील महाड येथे जन आशीर्वाद यात्रेनंतर नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे नाशिक पोलिसांनी राणे यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. तसेच नारायण राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना झालं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्रयंबद्दल केलेल्या आक्षेपाहार्य वक्तव्याबद्दल नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
मुंबईतून सुरु झालेली नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा एकेरी शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वक्तव्य केलं होत.