ऑनलाईन टीम / नाशिक :
मंगळवारी नाशिक जिह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. काल दिवसभरात नाशिकमध्ये 296 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. गंगापूर धरणातून दुपारी 12 नंतर 15 हजार क्मयुसेकने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरी नदीला पूर येणार आहे. त्यामुळे नदी लगतच्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
मंगळवारी नाशिकमधील नांदगाव, मालेगाव, बागलाण, सुरगाणा येवला तालुक्मयांत पावसाचा जोर अधिक होता. नांदगावला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री साडे तीन हजार क्मयूसेकने विसर्ग सुरू होता. तो आज सकाळी नऊ वाजता 7 हजार क्मयूसेक करण्यात आला आहे. आज दुपारी 12 नंतर तो 15 हजार क्मयूसेक केला जाणार आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात भरीव वाढ होणार असून, पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असेही मांढरे म्हणाले.