ऑनलाईन टीम / अमरावती :
जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाहीतर 2024 मध्ये शिवसेनेचे मोठे नुकसान होणार आहे, असे विधान रिपब्लकिन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
रामदास आठवले आज अमरावतीत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेने भाजपसोबत युती करावी असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. नाहीतर शिवसेनेचे 2024 मध्ये खूप मोठे नुकसान होईल. या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही, असे देखील आठवले म्हणाले.
यावेळी त्यांनी रिपब्लकिन ऐक्मयावरही भाष्य केले. ते म्हणाले, लोक तर सगळे म्हणतात हाय हाय लोक तर सगळे म्हणतात हाय हाय रिपब्लकिन पक्षाच्या ऐक्मयाच काय? अशी चारोळी करत त्यांनी ऐक्मयावर अधिक बोलणे टाळले. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचितकडून मते खाण्याचे राजकारण होत आहे.