कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालादरम्यान आरामबागमधील भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली. भाजपने तृणमूल काँग्रेसवर कार्यालयाला आग लावल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत कार्यालयातील बॅनर्स, कागदपत्रे आणि अन्य साहित्याची जाळपोळ करण्यात आली. यापूर्वी मतदानादरम्यानही राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. निकालानंतये राज्यात पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन होणार आहे. अशा परिस्थितीत, बंगालमधील या हिंसाचाराच्या विरोधात भाजप संघर्ष करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.