भगवंत म्हणाले, उद्धवा सर्वात श्रे÷ लाभ म्हणजे माझी भक्तिच होय. कारण तिच्या योगाने माझी प्राप्ती होते. आता विद्येबद्दल स्पष्टीकरण ऐक. ते फार महत्त्वाचे आहे. अविद्या म्हणजे अज्ञान ही अविद्या शुद्ध अशा आत्म्याला, वासनेचा दृढ संबंध जोडून जीवरूपाला आणते व अभेदामध्ये भेद उत्पन्न करते. हीच ‘अविद्याबाधा’ होय. जेव्हा मनुष्य देहाच्या माथ्यावर वर्णाश्रम आणि आश्रमाच्या माथ्यावर कर्म चढवतो तेव्हा त्या कर्माचा प्रबळ अभिमान झाल्यामुळे ‘देह हाच मी’ अशी बुद्धी उत्पन्न होते. हाच ‘जीवधर्म’ होय. जीवधर्मामुळे येणारी जीवाची बाधा नाहीशी करून त्याला चिदानंदस्वरूपाला मिळविते, तिच शुद्ध ‘आत्मविद्या’ होय.
जी अविद्या नाहीशी करते, तिलाच ‘शुद्धविद्या’ असे म्हणतात. इतर शास्त्रादिक ज्या चौदा विद्या आहेत, ती पाने फुटलेली अविद्याच होय. कारण शास्त्राच्या अभ्यासाने देहाच्या कर्माचा अभिमान वाढायचीच शक्मयता जास्त असते. आता ‘ह्री’ म्हणजे लज्जा तिचे स्वरूप ऐक. निंद्यकर्म करण्याविषयी लाज वाटणे हीच खरी लज्जा होय. केवळ अवयव झांकणे म्हणजे लज्जारक्षण करणे असा समज आहे पण ज्याला नितीधर्मानुसार आचरण करायचे आहे तो जीवप्राण गेला तरी अकर्म म्हणून करत नाही, तीच खरी ‘लज्जा’ होय. निरपेक्षता इत्यादी गुणच ‘श्री’ होय.
सुखदुःखाच्या पलीकडे जाणे म्हणजे ‘सुख’ कारण ज्यातून सुख मिळेल असे वाटते त्या विषयांची कामना हेच खरे ‘दुःख’ होय. बंधन व मोक्षाचे तत्त्व जाणणे हेच ‘पांडित्य’ होय. चौदा भुवनांच्या साऱया साम्राज्यवैभवासहित लक्ष्मी प्राप्त झाली तरी जो ढुंकूनसुद्धा तिच्याकडे पाहात नाही इतकी ज्याची निरपेक्षता तीच खरोखर उत्कृष्ट ‘श्री’ होय. असा श्री-मंत मला शिरसावंद्य असतो. ज्याला लक्ष्मीचीसुद्धा इच्छा नाही, तो निरंतर माझ्या मस्तकावरच राहात असतो. त्याच्यापेक्षा मला आवडणारा दुसरा कोणीच नाही.
उद्धवा! सुख किंवा महादुःख दोन्ही ग्रासून टाकून, जो ‘स्वाभाविक’ आनंद प्रगट होतो त्याचे नांव ‘सुख’. या सुखासाठी दुसऱयाची गरज लागत नाही, इंद्रियांचे उपकार घ्यावे लागत नाहीत आणि विषयांचीही आवश्यकता नसते. अशा स्थितीत हृदयात जो आनंद उत्पन्न होतो, त्याचे नाव ‘निजात्मसुख’. हे आत्मसुख विसरून विषयाची इच्छा करणे ह्याचंच नांव ‘महादुःख’ शुद्ध मूर्ख लोकच त्याचे सेवन करतात. रोज रोज जरी विषय प्राप्त झाले, तरी इच्छेची तृप्ती म्हणून होत नाही. विषयाची इच्छा हीच दुःखाच्या भोवऱयात
पाडते.
म्हणून विषयाची इच्छा हेच दुःख होय. हा बंध आणि हा मोक्ष हे ‘स्पष्ट रीतीने जो जाणतो त्याचेच नाव ‘पंडित ’. अशी अवस्था न मिळविता, आम्ही वेदशास्त्र शिकून सज्ञान झालो म्हणून पंडितपणाचा मिरवलेला अभिमान येथे उपयोगी पडत नाही. म्हणून ज्याला खरी शांती आणि समाधान प्राप्त झाले आहे, बंध कोणता व मोक्ष कोणता याचे ज्ञान आहे, त्याला महापंडित असे म्हणतात.
शरीर इत्यादींना ‘मी’ मानणारा तो ‘मूर्ख’ होय. माझी प्राप्ती करून देतो, तोच खरा ‘मार्ग’ होय. चित्ताची बहिर्मुखता हाच ‘कुमार्ग’ होय. सत्त्वगुणाची वृद्धी म्हणजेच ‘स्वर्ग’
एखादा वेदशास्त्र जाणणारा नसला म्हणजे त्याला लोक ‘मूर्ख’ म्हणतात पण तो मूर्खपणा येथे मान्य नाही. तर केवळ देहाभिमानी असतो तोच येथे ‘मूर्ख’ समजला जातो. कारण नाशवंत देह तोच मी असे समजून, तो हर्ष मानतो, त्या देहाच्या अभिमानाने नरक भोगतो, ह्यापेक्षा मूर्ख दुसरा कोण आहे ? कुठल्याही देहाचे स्वरूप पहावयास गेले, तर अस्थि, चर्म, वि÷ा आणि मूत्र एव्हढेच असते अशा देहाचा मनुष्य देहाचीच ‘मी’ म्हणून आढ्य़ता मिरवितो, तो खराखुरा ‘मूर्ख’ होय. आणि देहाची अहंता बाळगणे हिचेच नाव ‘मूर्खता’ होय. तर माझ्या वेदमार्गाने चालणे हाच ‘सन्मार्ग’
होय.s
ज्याला चित्तभ्रंश झाला असेल तोच गुरूची व देवाची निंदा करतो. जो वेदशास्त्रार्थ मानीत नाही, तोच आडमार्गात जाऊन पडतो.
क्रमशः