गुरूवारी आणखी चौघांचा शोध घेण्यात यश
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्य़ातील व्यक्तींची संख्या 7 वर पोहचली आहे. गुरूवारी आणखी चार जणांचा शोध लावण्यात प्रशासनाला यश आले असून एकूण 5 जणांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघे जिल्हय़ाबाहेर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पाच स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्यांच्या कुटुंबीयांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, अहमदनगर येथील इमाम कार्यक्रमातून परतलेल्या एका व्यक्तीला गुहागरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दिल्लीतील मरकजमध्ये 2 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याचा व त्यात राज्यातील 1400 लोंकाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मरकजमध्ये कोरोनाग्रस्तांचा सहभाग आढळून आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हय़ातील 8 ते 10 जणांचा सहभाग असल्याचे पुढे आले होते. मात्र प्रशासनाकडून त्याला दुजोरा दिला जात नव्हता. गुरूवारी सकाळी प्रशासनाने अधिकृतरित्या मरकजमध्ये सहभागी तीनच व्यक्ती आढळल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर काही तासातच पोलीसांच्या गतीमान यंत्रणेतून आणखी चौघांचा शोध लावण्यात यश आले.
होम क्वारंटाईन 10 ने वाढली
जिह्यात होम क्वारंटाईनमध्ये असणाऱयांची संख्येत 10 ने वाढ होऊन ती 937 झाली आहे. या सर्वांच्या हातावर शिक्के मारले असून त्यांच्या घराच्या दर्शनी भागात तशा सूचना लावल्या असल्याचे प्रशासनाकडून काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
संस्थात्मक क्वारंटाईन अंतर्गत एकूण 147 लोक दाखल असून त्यापैकी जिल्हा सामान्य रुग्णालयात 18 जणांना ठेवण्यात आले आहे. बुधवारी प्राप्त झालेले सर्व 6 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिह्यात 9 तालुक्यांमध्ये 48 निवारागृहात 61 जणांच्या निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 874 जणांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाने केली. यात रत्नागिरी 349, राजापूर 55, चिपळूण 421, खेड 40, दापोली 9 याप्रमाणे मदत करण्यात आली आहे.
कलम 144 चे उल्लंघन केल्याबद्दल रत्नागिरीत 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या तसेच एका अदखलपात्र गुह्याची नोंद या काळात झाली आहे. महिलांसाठी त्यांच्या प्रधानमंत्री जनधन खात्यात आगामी 3 महिने दरमहा 500 रुपये जमा होणार आहेत. सोशल डिस्टन्सींगसाठी याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आले आहे. शिधा धारकांना एप्रिल महिन्याचा शिधा सध्या देण्यात येत आहे. 9 एप्रिल नंतर केंद्राच्या घोषणेनुसार अंत्योदय व केशरी कार्डधारकांना प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत वाटण्यात येणार आहे.
अहमदनगरच्या इमाममध्ये सहभागी व्यक्ती ताब्यातगुहागर
दिल्लीजवळच्या निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाननंतर अहमनदनगर येथील इमाम कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या गुहागर तालुक्यातील पडवे येथील एकाला पोलिसांनी ताब्यात घेत गुहागर ग्रामीण रूग्णालयात क्वारंटाईन केले आहे. तसेच अंजनवेल येथील केएलपीपीएलमध्येही अहमदाबाद येथून आलेल्या 6जणांना तालुका आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन करून घेतले आहे. जिल्हाधिकाऱयांकडून या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला क्वारंटाईन करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
‘तरुण भारत’ च्या वृत्ताची यथार्थता
गुरूवारच्या ‘तरुण भारत’मध्ये ‘निजामुद्दीन मरकजमध्ये जिल्हय़ातील 10 जण?’ या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये जिल्हय़ातील 8 ते 10 जणांचा मरकजमध्ये समावेश असल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रशासनाकडून मात्र त्याला दुजोरा मिळाला नव्हता. तथापी गुरूवारी सकाळी प्रशासनाने तीन व्यक्तीचा सहभागाला दुजोरा दिला. मात्र त्यानंतर पोलिसांनी आणखी 4 लोकांचा शोध घेतल्याने ही संख्या 7 वर पोहचली. गुहागर तालुक्यातही अहमदनगरहून परतलेल्या व्यक्तीचा शोध लागल्याने ही संख्या 8 झाली आहे.