वार्ताहर/ परळी
उरमोडी हा जलाशय आणि त्याच्या किनाऱयावर वसलेले नित्रळ गाव 2009 साली गाव धरणाच्या विळख्यात अडकले. मात्र भाई वांगडे व नित्रळ ग्रामस्थांनी एकी दाखवत संपूर्ण गाव पुन्हा वसवले. केदारनाथ धाम पंच देवायलाय उभारणी ज्या पद्धतीने केली आहे, खरंच नित्रळ धरणग्रस्त गावाने घेतलेली भरारी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन नित्रळ येथील केदारनाथ मंदिरात महिलांच्या हळदी-कुंकू प्रसंगी अभिनेत्री अलकाताई कुबल-आठल्ये यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई रांजणे, हिरकणी फाउंडेशन संस्थापिका जयश्रीताई शेलार, आनंदिता लेडीज फोरमच्या दीपांजली पवार यांची उपस्थिती होती.
अभिनेत्री आलकाताई कुबल-आठल्ये पुढे म्हणाल्या, गावचे नेतृत्व करणारे भाई वांगडे आणि ग्रामस्थांची एकीमुळे ना भूतो ना भविष्य असे केदारनाथाचे मंदिर परिसराला एक आदर्श म्हणूनच पाहायला मिळणार आहे. आशा पवित्र स्थानी मला पाहुण्या म्हणून मला बोलवलं हे मी माझं भाग्य समजते. भाईंनी नित्रळ गावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात केले असून असे नेतृत्व प्रत्येक गावात निर्माण होणे गरजेचे आहे.
यावेळी अर्चनाताई रांजणे, जयश्रीताई शेलार, दिपंजली पवार यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी भाई वांगडे, रोहित वांगडे, चंद्रकांत वांगडे, किरण वांगडे, प्रताप वांगडे, सुनील वांगडे, सचिन वांगडे, निलेश वांगडे यासह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन धन्वंतरी वांगडे यांनी केले.
चौकट
वेदांतिकाराजे म्हणाल्या, भाई असे व्यक्तिमत्व आहे की शांत स्वभाव आणि प्रत्येकाला सहकार्याची भूमिका म्हणूनच गावकऱयांच्या साथीने अद्भुत असे केदारनाथ धाम पंच देवायलायाची उभारणी केली आहे. भाईंचे मार्गदर्शन जसे गावकऱयांना नेहमी मिळतं तसेच शिवेंद्रराजेंना देखील भाईंची नेहमीच भक्कम साथ मिळते. धरणाच्या लगत अन सह्याद्रीच्या डोंगराच्या कडेपारित हे केदारनाथाची मंदिर खरंच खूप सुंदर दिसत आहे.