मंत्री शशिकला जोल्ले यांच्या अधिकाऱयांना सूचना : शेतीपिकांसह आस्थापनांचे मोठे नुकसान : भरपाई नुकसानग्रस्तांसाठी ठरणार आधार
निपाणी / वार्ताहर
गेल्या दोन ते तीन दिवसात वाढलेला उष्मा, त्यातच निर्माण झालेले ढगाळी वातावरण याचा परिणाम होताना शनिवारी सायंकाळी निपाणी तालुक्मयात वळिवाच्या पावसाने हजेरी लावताना झोडपून काढले. ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाचा वारा यासोबत आलेल्या पावसाने परिसरात मोठे नुकसान केले. पिकांबरोबरच अनेक घरांचे देखील नुकसान झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान याचे गांभीर्य लक्षात घेत मंत्री शशिकला जोल्ले यांनी रविवारी सकाळी तालुक्मयातील महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱयांना आदेश देताना सर्व्हे करून तातडीने अहवाल द्यावा, अशा सूचना दिल्या.
निपाणी तालुक्मयात सध्या तंबाखू भरणी आणि निटनिवाडा करण्याची कामे पूर्ण झाली असून चाकीची कामे गतीने सुरू आहेत. त्याचबरोबर रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी पिकाची कापणी, खुडणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. अशा या परिस्थितीत वळिवाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ज्वारी पिकाबरोबरच मिळणारा वर्षभरासाठी वैरण म्हणून मिळणारा कडबा (सुका चारा) भिजल्याने येत्या काळात चाऱयाची मोठी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. हातातोंडाशी आलेला घास वळिवाच्या पावसाने हिरावून घेतल्याच्या भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.
शेडचे पत्रे उडाले, जनावरेही जखमी
गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले होते. हे नुकसान दुर्लक्षित करत शेतकऱयांनी हाताशी आलेली पिके काढून घेण्याची लगबग चालवली होती. तोच पुन्हा वळीव पावसाने हजेरी लावताना शेतीपिकांचे मोठे नुकसान केले. याचबरोबर झालेल्या वादळी वाऱयात अनेक घरांचे, शेडचे नुकसान झाले आहे. संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान होताना अनेक संसार उघडय़ावर पडले आहेत. दूध उत्पादनासाठी बाळगलेली जनावरे उघडय़ावर पडताना काही जखमी झाली आहेत.
मंत्री शशिकला जोल्ले यांनी तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश दिल्याने नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महसूल विभागाचे अधिकारी सर्व्हे कधी करणार आणि अहवाल पोचल्यानंतर नुकसान भरपाई तातडीने मिळणार का?, याकडे सर्वच नुकसानग्रस्तांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अधिकाऱयांनीही तत्काळ आदेशाचे पालन करताना लवकरात लवकर सर्व्हे करून भरपाई देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही नुकसानग्रस्तातून व्यक्त होत आहे.
तातडीने मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध
मंत्री शशिकला जोल्ले यांनी, गेल्या दोन वर्षात शेतकरी विविध संकटांना तोंड देत शेती उत्पादन घेत आहे. अशा या परिस्थितीतून शेतकरी बाहेर पडत असतानाच वळिवाच्या पावसामुळे शेतकऱयांच्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱयामुळे अनेक घरांची तसेच शेडची पडझड झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुक्मयातील सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱयांना तातडीने सर्व्हे करण्याची सूचना केली आहे. नुकसानीचा अहवाल मिळताच राज्य शासनाकडे पाठपुरावा करून तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांने सांगितले.