चित्रानक्षत्राच्यादमदारसलामीनेचिंता:तंबाखू, ऊसपिकासाठीठरणारमारक
वार्ताहर/ निपाणी
वातावरणात वाढलेल्या उष्म्याचा परिणाम होताना शनिवारी सायंकाळी विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावताना निपाणीसह परिसराला झोडपून काढले. सुमारे एक तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. चित्रा नक्षत्राला दुपारी 1.33 वाजता प्रारंभ होताच हा पाऊस दमदार सलामी देणारा ठरला. पण हा पाऊस तंबाखू, ऊस पिकासह फळ व भाजीपाला उत्पादनासाठी मारक ठरणार असल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.
यंदा पावसाचा हंगाम सुरू झाल्यापासूनच समाधानकारक पाऊस पडला आहे. यामुळे सर्वच पिकांची वाढ जोमाने होताना उत्पादनही चांगले हाती येण्यास मदत झाली आहे. पण गेल्या महिन्यात खरिपाची काढणी सुरू असतानाच शेतकऱयांचे मोठे नुकसान करणारा पाऊस झाला. या पावसाच्या नुकसानीतून बाहेर पडण्याचा शेतकरी प्रयत्न करत असतानाच हा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
सध्या शेतशिवारात रब्बीच्या पेरणीची तयारी सुरू आहे. हा पाऊस रब्बीच्या पेरणीसाठी पोषक ठरणार आहे. पण तंबाखू, फळ, भाजीपाला उत्पादनाबरोबरच तोडणीसाठी आलेल्या ऊस पिकासाठी मारक ठरणार आहे. यातून शेतकरी हवालदिल झाला आहे.
अनेक घरात शिरले पाणी
सुमारे तासभर जोरदार वृष्टी झाल्याने रस्त्यावरुन मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत होते. शहरातील शिवाजीनगर, दर्गाह गल्लीसह अनेक सखल भागातील नगरांमध्ये घरात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नियोजनाविना रस्ते व गटारींच्या बांधणीमुळे अशा समस्या निर्माण होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.