वार्ताहर / निपाणी :
प्रत्येक स्वयंपाक घरात कांद्याचा वापर नियमीतपणे केला जातो. पण अतिवृष्टी, महापूर, ढगफुटीसदृश्य पाऊस आणि धुके अशा एकामागोमाग एक आलेल्या संकटांमुळे कांदा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. उत्पन्न घटल्याने बाजारपेठेतील आवकही घटताच कांदा दराने अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढत उच्चांक गाठला. परिणामी ग्राहकांच्या डोळय़ात पाणी आले. दराचे दीडशतक पार केलेल्या कांद्याचे भाव कधी कमी होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. गुरुवारच्या आठवडी बाजारात ग्राहकांना दिलासा मिळताना कांदा भाव 40 रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला. यामुळे ग्राहकवर्गात समाधान व्यक्त होत आहे.
कांदा दरवाढीमुळे गृहिणी, हॉटेलचालक अडचणीत आले होते. जेवणावळीतून कांदा गायब झाला होता. अनेक हॉटेलमध्ये कांदा मिळणार नाही, असे फलकही झळकत होते. विधानसभेसह लोकसभेत कांदा दरवाढीतून वादळी चर्चा होत होत्या. अशा परिस्थितीत काहीसे उत्पादन वाढताच कांदाभाव कमी झाला. गेल्या दोन महिन्यात कांदाभाव वाढल्याचा अधिकतर साठेबाजा कांदा व्यापाऱयांनी उठवला. पण आता शेतकऱयांच्या हाती कांदा उत्पादन येताच भाव गडगडल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. किमान यापेक्षा भाव कमी होऊ नयेत, अशी अपेक्षा उत्पादक शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
गेल्या महिन्याभरात बटाटय़ाचे भाव वाढले आहेत. हा भाव या आठवडय़ातही स्थिर राहिला असून प्रतिकिलो 40 रुपये दराने विक्री होत आहे. वांगी 40 रुपये, दोडका 60 रुपये, टोमॅटो 10 रुपये, बेनस 60 रुपये, भेंडी 50 रुपये, ढबूमिरची 40 रुपये, हिरवी मिरची 50 रुपये प्रतिकिलो तर कोथींबिर 10 रुपये, पोकळा 10 रुपये, मेथी 8 रुपये पेंडी दराने, फ्लॉवर, कोबी 30 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.