अखेर पोलिसांनी आझाद मैदानावरुन घेतले ताब्यात
प्रतिनिधी /पणजी
विधानसभेवर मोर्चा नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या निम्न शिक्षकांना (पॅरा टिचर्स) अखेर पोलिसंनी ताब्यात घेतले. आझाद मैदानावर मोठय़ा प्रमाणात तैनात असलेले पोलिस व निम्न शिक्षक यांच्यात काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाली. निम्न शिक्षक आझाद मैदावरून बाहेर पडले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु निम्न शिक्षक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे शिक्षक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. अखेर सर्व निम्न शिक्षकांना बसमध्ये भरून आगशी पोलीस स्थानकात नेण्यात आले.
नोकरीत कायम करा या प्रलंबीत मागणीसाठी निम्न शिक्षकांनी गेल्या काही दिवसांपासून नव्याने आंदोलन सुरु केले आहे. ताब्यात घेतलेल्या निम्न शिक्षकांना काही वेळाने पोलिसांनी आपापल्या घरी जाण्याची अनुमती दिली. मात्र निम्न शिक्षकांनी आगशी पोलीस स्थानकावरच ठाण मांडून रात्रभर आगशी पोलीस स्थानकावरच राहण्याचा निर्णय घेतला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर कुटुंबासह रस्त्यावर येऊ, असा इशारा निम्न शिक्षकांनी दिला आहे.
सोमवारपासून निम्न शिक्षकांनी आंदोलन सुरु केले असून, मंगळवारी त्यांनी भाजप कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तानावडे त्यांना भेटलेच नाही. त्यांनी आझाद मैदानावर धरणे सुरु केले.
विधानसभेवर मोर्चा नेण्याची तयाराr
काल गुरुवारी त्यांनी विधानसभेवर मोर्चा नेण्याचे ठरविले होते. सध्या अधिवेशन सुरु असल्याने 144 कलम लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी निम्न शिक्षकांची भेट घेतली व वस्तूस्थिती समजाऊन सांगितली. पोलिसांसोबत तिसवाडी तालुका मामलेदार, उपजिल्लाधिकारी उपस्थित होते. निम्न शिक्षक ऐsकून घेण्याच्या मनस्थिती नव्हते त्यांनी विधानसभेवर जाण्याचा निर्णय घेतला व आझाद मैदानावरून बाहेर आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. एकूण 129 निम्न शिक्षक असून त्याच्यातील 100 हून अधिक निम्न शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.
कित्येक वर्षे सरकारने ठेवले झुलवत
सरकाने केवळ आश्वासने देऊन निम्न शिक्षकांना गेली कित्येक वर्षे झुलवत ठेवले आहे. आता वय झाल्यामुळे दुसरीकडे नोकरीसाठी अर्ज करण्याचा पर्यायही आमच्याकडे उरलेला नाही. म्हणून सरकारने अम्हाला नोकरीत कायम करावे. ज्यांचे वय झालेले आहे, त्यांना वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी मागणी निम्न शिक्षकांनी केली आहे. गेल्या 15 वर्षापासून आम्ही सरकार दरबारी आमचा प्रश्न मांडीत आहोत. प्रत्येकवेळी आम्हाला केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. म्हणून आता पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली असून सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निम्न शिक्षिका स्मिता देसाई यांनी सांगितले.
वेळप्रसंगी कुटुंबांसह उपोषण करणार : देसाई
स्मिता देसाई पुढे म्हणाल्या की सरकार नोकरीत कायम करणार या आशेवर गेली कित्येक वर्षे तुटपुंजा पगारावर आम्ही काम करीत आहोत. आमच्या मागणीसाठी कित्येकवेळा शांततेत आंदोलनेही केली. अनेक वेळा मुख्यमंत्र्यासह आमदार, मंत्र्याच्या भेटी घेऊन त्यांच्यासमोर आमचा प्रश्न मांडला. पण आत्तापर्यंत काहीच झाले नाही. आता करो किंवा मरो अशी स्थिती झाली आहे. वेळ आली तरी आझाद मैदानावर कुटुंबासह आमरण उपोषण करू असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.