अंतरा-मल्हारला एकमेकांसमोर
सात जन्माच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात…आयुष्याच्या जोडीदाराची कुठल्यातरी टप्यावर भेट हि लिहून ठेवलेली असते. पण नियतीच्या खेळीत अडकलेले दोन जीव अंतरा मल्हार एकत्र कसे येणार? अखेर अंतराचा मल्हार होणार का याची सध्या जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. बहिणीच्या चालाखीने अंतरा-मल्हारच्या नात्याची गाठ बांधली जाणार? गैरसमजातून हे नातं दूर जातंय का असं वाटत असतानाच नियतीने पुन्हा पुन्हा अंतर-मल्हारला एकमेकांसमोर आणलं.
अचानक भेटणं असो किंवा मग भांडण असो अंतरा-मल्हार एकमेकांना भेटत राहिले. कारण काहीही असलं तरी प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांना मात्र हेच वाटत राहिलं कि श्वेताच बिंग फुटणार आणि अंतरा-मल्हार एकत्र येणार. पण नियतीचा हा खेळ थोडा अनपेक्षितच ठरला. श्वेताने रचलेले सगळेच डाव अनपेक्षितरित्या अंतरानेच पूर्ण केले आणि अंतरा-मल्हारचे सूर जुळणार कि नाही या रोमांचक वळणावर प्रेक्षकांना घेऊन आले. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी जीव माझा गुंतला लग्न सोहळा विशेष सप्ताह 20 सप्टेंबरपासून प्रदर्शित होणार आहे.
जीव माझा गुंतला या मालिकेत श्वेताचे सगळे प्रयत्न यशस्वी होऊन मल्हार बोहोल्यावर चढणार का? पत्रिकेच सत्य समोर येऊनही अंतरा ते गुपित लपवून ठेवणार का? लग्नाच्या शुभमुहूर्तावर खर सगळ्यांसमोर येऊन चित्र पालटणार असं कुठेतरी वाटतं आहे. या शुभ मुहूर्तावर श्वेता, अंतरा आणि मल्हार यांचं आयुष्य नक्की कुठलं वळण घेणार? श्वेता आणि मल्हारच्या लग्नाचा विधी पार पडताना अचानक असं नेमकं काय घडणार की मंडपात श्वेता ऐवजी अंतराला उभ राहावं लागणार? मल्हार आणि अंतरा याला विरोध करतील? कि श्वेता नवा डाव खेळणार ज्यामुळे हा प्रश्न कायम राहणार का. हे जीव माझा गुंतला
लग्न सोहळा विशेष सप्ताहात दिसेल.