जिल्हाधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या आठवडय़ाप्रमाणेच शनिवार दि. शनिवार दि. 14 व रविवार दि. 15 ऑगस्ट रोजी विकेंड कर्फ्यु असणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर कर्फ्यु असणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कर्फ्यु असणार आहे. नियमांचे पालन करीत स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामुळे रविवारी कर्फ्यु असणार का? या विषयी सातत्याने विचारणा केली जात होती. तरुण भारतकडे अनेकांनी विचारणा केली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संबंधी खुलासा केला आहे.
15 ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. यामुळे सर्व संस्था, संघटना यांना नियमांचे पालन करीत स्वातंत्र्य दिन साजरा करता येणार आहे. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी केली जावू नये. मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत स्वातंत्र्योत्सव साजरा करावा, असेही जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
बेळगाव जिह्यात रुग्ण संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत विकेंड कर्फ्युची गरजच काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या आठवडय़ात विकेंड कर्फ्युमुळे व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नियम पाळून व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापारी संघटनांच्या बैठकीत करण्यात आली आहे.