आरटीओ शिवानंद मगदूम यांचा आदेश : कोरोना काळातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा उदेक वाढत चालला आहे. तरीदेखील सरकारी कार्यालये सुरूच आहेत. येथील आरटीओ कार्यालय देखील जनतेला समस्या निर्माण होऊ नये यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी दाखविलेली निष्काळजी अधिकाऱयांची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहेत. त्यामुळे यापुढे कोरोना नियमांचे पालन न केल्यास संबंधित नागरिकांची कामे करू नये, असे आवाहन आरटीओ शिवानंद मगदूम यांनी अधिकाऱयांना केले आहे. यामुळे यापुढे जर आरटीओ कार्यालयात कामे व्हायची असतील तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
रस्ते वाहतूक कार्यालयात नेहमीच गर्दी होत असते. मात्र येथे येणारे नागरिक आपली कामे करून घेण्यासाठी कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. तर प्रवेशद्वावर असणाऱया होमगार्डवर दादागिरीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे यापुढे या कार्यालयात काम व्हायचे असल्यास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांची कामे करून देऊ नका, असे आवाहनही आरटीओ शिवानंद मगदूम यांनी केले आहे.
कोरोनासारखा महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र याकडे नागरिकांनी कानाडोळा केला आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने अनेकांची डोकेदुखी वाढविणारा ठरत आहे. अशा परिस्थितीत वाहन परवाना व इतर कामांसाठी येणारे नागरिक सामाजिक भान ठेवणे विसरत आहेत. त्यामुळे हा आजार आपल्या कार्यालयात शिरल्यास याचा मोठा परिणाम महसुलावर होणार असून यापुढे जर काम व्हायचे असल्यास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
जनतेमध्ये अजूनही सोशल डिस्टन्सबाबत जनजागृती नाही. त्यामुळे खुद्द आरटीओ शिवानंद मगदूम हे रांगेत उभे राहिलेल्या व्यक्तींना सोशल डिस्टन्स पाळण्याची सूचना केल्या होत्या. मात्र त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी आता कठोर पावले उचलली आहेत. यापुढे आरटीओ कार्यालयात कामे व्हायची असल्यास नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात यावे, असे अधिकाऱयांना सांगितले आहे. त्यामुळे आता आरटीओ कार्यालयातही अधिकाऱयांनी दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
बेळगाव येथील एक मुख्य कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱया आरटीओ (रस्ते वाहतूक कार्यालय) येथे सुरिक्षत ठेवण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. आरटीओ कार्यालय परिसरात आता मार्किंग करण्यात आली आहे. त्या मार्किंगमध्येच नागरिकांनी उभे राहून सुरक्षित अंतर व नियमांचे पालन करण्याऐवजी त्याचे उल्लंघन करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे आता यापुढे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. काहींनी तर अधिकाऱयांवरच दादागिरी करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन नियमांचे पालन न केल्यास त्यांची कामे करू नये, असे आवाहनही शिवानंद मगदूम यांनी केले आहे.
शिवानंद मगदूम-आरटीओ
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर आरटीओ मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. वाहन परवाना काढणे, त्यासाठी अर्ज भरणे, परवान्यासाठी लागणारी फी भरणे, वाहनांची नोंद करणे यासह अनेक कामांसाठी नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत. मात्र नियमांचे पालन करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यापुढे जर नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांची कामे थांबविण्यात यावीत, अशा सूचना अधिकाऱयांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले..