चिपळुणात पहिल्या दिवशी रात्री 8 नंतरही दुकाने सुरूच
प्रतिनिधी/ चिपळूण/रत्नागिरी
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जारी केलेले नियम अद्याप सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेले नाहीत. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी व्यापाऱयांसह नागरिकांना संचारबंदीचा विसर पडल्याचे चित्र दिसून आले. दुकाने व गर्दी कायम होती, तर दारूची दुकाने हाऊसफुल्ल राहिली. दुसरीकडे रत्नागिरी शहरात कोरोरानाची वाढती संख्या लक्षात घेता शासनाकडून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंतच्या लॉकडाऊनचे व्यापाऱयांनी पालन केल्याचे चित्र दिसून आल़े अनेकांनी दुकाने 8 वाजण्यापूर्वीच बंद केली होत़ी काही ठिकाणी अपवादात्मक दुकाने सूरू असल्याचेही दिसून आल़े
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने कहर केला आहे. सर्वचठिकाणी मोठय़ाप्रमाणात रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे रविवारी शासनाने 30 एप्रिलपर्यंत दररोज रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र ही नवी नियमावली अद्याप सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱयांना तितकीशी समजली नसून या नियमांबाबत संभ्रमावस्था आहे. प्रशासनानेही सोमवारी हे नियम नागरिक, व्यावसायिकांपर्यंत नेलेले नाहीत.
त्यामुळे सोमवारी पहिल्याच दिवशी रात्री 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या संचारबंदीचा सर्वानाच विसर पडल्याचे चित्र पहायला मिळाले. 8 वाजल्यानंतरही सर्व व्यवहार पुढे काही तास तसेच सुरू होते. विशेष म्हणजे ग्राहकांचीही तितकीच गर्दी दिसून येत होती. सर्वच दुकानांमध्ये गर्दी होती, तर दारूची दुकाने गर्दीने अधिक फुलून गेली होती. अनेक दुकानांमध्ये तळीरामांच्या लांबसडक रांगा दिसून येत होत्या. याबाबत काही दुकानदारांना विचारले असता पहिला दिवस आहे, उद्यापासून प्रशासन सांगेल तसे वागू असे सांगितले गेले.
रत्नागिरी शहरात लॉकडाऊन होणार या भितीने मद्यांच्या दुकानाबाहेर वर्दळ दिसून आल़ी तसेच किरणा मालाची दुकाने उघडी राहणार असे सांगून देखील जिन्नस घेण्यासाठी लोक घराबाहेर पडल्याचे दिसून आल़े लॉकडाऊन करण्यासंबधी सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आह़े व्यापार व हातावर पोट असलेल्यांना या गोष्टीचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून आले आह़े त्यामुळे लॉकडाऊन करताना सर्वसामान्य नागरिकांचा विचार करण्यात यावा अशी मागणी होत आह़े सध्या तरी अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर अस्थापने बंद करण्यात आली आहेत़
चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार ः पोळ
याबाबत चिपळूण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याशी संपर्क साधला असता संचारबंदी लागू राहणार आहे. तिचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी शहरासह आवश्यक त्या सर्व भागात चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्याचे नियोजन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संचारबंदीसह अन्य नियम मोडणाऱयांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.