मुंबई/प्रतिनिधी
सरत्या २०२१ या वर्षाला निरोप देत नव वर्षाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरु झाली आहे. पण पार्टी करणाऱ्यांनो सावधान. देशात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. तसे आदेशही दिले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पार्टीचे आयोजन करुन नये असे आवाहन राज्य सरकारकडून केले जातेय. तर दुसरीकडे कोरोनाविरोधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणावे की, ज्यांना पार्टी करायची आहे त्यांच्यासाठी पूर्ण वर्ष आहे. मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेत कुटुंबियांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करा. पोलिसांना सूचना दिल्या असून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच येणार आहे. त्यामुळे कारवाई करण्यापेक्षा लोकांनी कोरोनाचे नियम पाळा, गर्दी करु नका, असे आवाहन गृहमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.