विश्वात सकारात्मकता आणि नकारात्मकता हातात हात घालून चालत असतात. मनुष्यप्राणी कधी कधी सकारात्मक तर कधी कधी नकारात्मक असतो. प्रत्येक क्षणाला मानवी मन हे सकारात्मक असेलच किंवा आशावादी असेलच असे नाही. तसेच मानवी मन हे प्रत्येक क्षणाला नकारात्मक किंवा निराशावादी अथवा उदासीन असेलच असे नाही. मनाचा वेग हा खूप प्रचंड आहे. हा वेग आवरणे कठीण असते म्हणूनच श्रीसमर्थांनी मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक सांगितले आहेत. मानवी मन हे जर कमकुवत असेल तर त्याला शिस्त लावणे खूप गरजेचे आहे. ज्या मनुष्याचे स्वतःच्या मनावर नियंत्रण नसते तोच मनुष्य सुरुवातीला बेशिस्तीने वागतो नंतर हळूहळू त्याचे मन अशांत व्हायला लागते. मग त्या अशांत मनात राग, द्वेष, सूड, मोह आणि दंभ वास करायला लागतात आणि अतिशय मंदगतीने हे विक्षिप्त मन बुद्धीचा ताबा घेते. जेव्हा बुद्धी कुंठीत व्हायला सुरुवात करते तेव्हा विवेकशक्ती नष्ट होते. विवेकशक्ती नष्ट झाली की भ्रम उत्पन्न होतात त्यातून संशय निर्माण होतो. संशयाचे रूपांतरण हे विद्रोहात होते आणि विद्रोहाचे पर्यवसान हे विनाशात होते. ह्याच विनाशाचे मूळ हे मनुष्याच्या बेशिस्तीत दडलेले आहे. म्हणूनच श्रीसमर्थांनी मानवी मनाला वळण लावण्याकरिता ग्रंथराज दासबोधाची आपल्याला देणगी दिली आहे.
व्यवस्थापनशास्त्रात सुद्धा बेशिस्तपणावर खूप काम करण्यात आलेले आहे. जेव्हापासून औद्योगिक क्रांती झाली आहे तेव्हापासून व्यवस्थापनशास्त्रात बहुधा व्यवस्थापनातील बेशिस्तपणावर सूक्ष्म पद्धतीने काम करण्यात आलेले आहे. व्यवसायसंस्थेने जे नियम आखून दिलेले असतात ते न पाळणे, कायदे न पाळणे, सर्वच स्तरातील कर्मचाऱयांशी मुजोरीने वागणे ह्यास व्यवस्थापनशास्त्रातील बेशिस्तपणा असे म्हणतात. बेशिस्तपणाच्या लक्षणात व्यवसाय संस्थेत सामान्य वर्तणुकीतील बदल, गैरहजेरी, उदासीनता, कामाचा वेग मंदावणे, तक्रारींच्या संख्येत किंवा स्वरूपात होत असलेली वाढ, सातत्याने अतिरिक्त भत्याची मागणी वाढणे, कार्यक्षमतेचा अभाव वाढणे हे घटक दिसून येतात. बऱयाच वेळी काही अंतर्गत गट किंवा बाह्य गट हे सुद्धा बेशिस्तीला कारणीभूत असतात. अनेकवेळा असेही आढळून येते की वरि÷ांचा अप्रामाणिकपणा, कामाप्रतीची नि÷ा नसणे ह्यामुळे देखील व्यवसायसंस्थेतील कर्मचारी किंवा कामगार बेशिस्तपणे वागतात. व्यवस्थापनातील बेशिस्त ही कशी फोफावत जाते हे सांगणे खूप कठीण आहे पण जे निरीक्षणातून जाणवते त्यात असे सांगता येईल की एखादी उद्योगसंस्था किंवा व्यवसायसंस्था निर्माण केली जाते. सुरुवातीला त्यातील मालक, कर्मचारी, कामगार, अधिकारी हे अतिशय नि÷sने काम करत असतात. परंतु, जसाजसा संस्थेचा व्याप वाढत जातो तसतसे संस्थेतील वरि÷-कनि÷ वाद वाढत जातात. त्यानंतर कामावरील नि÷ा कमी होऊ लागते आणि असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन संबंधित व्यवसायसंस्था ही लयास जाते. ह्याविषयी श्रीसमर्थ दासबोधातील कहाणी निरुपण समासात असे सांगतात की,
पिता उगाच बैसला ! लेके बहुत व्याप केला!
सर्वज्ञ जाणता भला ! जे÷ पुत्र!!
नातु त्याचे अर्ध जाणे ! पणतु तो काहीच नेणें!
चुकत्ता संहारणे ! माहा क्रोधी!!
लेक सकळांचे पाळण करी ! नातु मेळवी वरिचावरी !पणतु चुकल्या संव्हार करी ! अकस्मात !!
13/ 05/ 08-09-10
म्हणजे, मूळपुरुष पिता स्वस्थ बैसला, त्याच्या मुलाने पुष्कळ व्याप केला, तो सर्व काही जाणणारा होता आणि सगळय़ात वडील होता. नातू हा अर्धेच जाणणारा होता, आणि पणतु तर काहीच जाणत नसल्याने तो भयंकर रागीट होता. त्यामुळे चूक झाली की संहार करण्यास तो तयार होतो. व्यवस्थापनाच्या दृष्टीने ह्या ओवींचा विचार केल्यास असे जाणवते की एखादे कुटुंब, संस्था किंवा संघटनेची निर्मिती, विस्तार आणि लय अशाप्रकारे होऊ शकतो.व्यवसाय संस्थेत जर कर्मचाऱयांना योग्य शिक्षण दिले गेले नसेल, अनुभवाच्या आणि प्रशिक्षणाच्या योग्यतेनुसार काम दिले गेले नसेल तर वरि÷ांनी ठरवून दिलेल्या चौकटीतच कनि÷ांना रहावे लागते. अनेकवेळी वरि÷ांची वागणूक ही आखून दिलेल्या चौकटी पलीकडील असते. अशा परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होते.
अधिकारी वर्ग हा जर व्यक्तीनि÷ दृष्टिकोन ठेवून कर्मचाऱयांचे किंवा कामगारांचे सदोष मूल्यमापन करत असेल तर त्यामुळे बेशिस्त वाढते. जर कर्मचाऱयांच्या भावना, विचार, प्रतिक्रिया उच्चस्तरीय व्यवस्थापनापर्यंत पोहोचल्या नाहीत तर मात्र ते आक्रमक होऊ शकतात. व्यवस्थापनशास्त्रात जेव्हा नेतृत्व कमकुवत, लवचिक आणि अयोग्य असते अशावेळी बेशिस्त वाढीस लागते. तसेच एखाद्या संस्थेत सदोष पर्यवेक्षण आणि योग्य पर्यवेक्षकांचा अभाव असेल तर कर्मचाऱयांवर वचक न राहिल्याने बेशिस्त वाढते. काही नियम आणि कायदे हे प्रत्यक्षात राबवणे कठीण असतात असे नियम आणि कायदे अस्तित्वात असतील तर नियमभंग होण्याचे प्रमाण जास्त असते. नियम किंवा कायदे बनवत असताना जर वेळीच काळजी घेतली गेली नाही तर बेशिस्त निर्माण होऊ शकते. नियमांचे प्राबल्य किंवा ताठरपणा आणि त्याचे अयोग्य रीतीने पालन करावे लागणे ह्यामुळे कर्मचाऱयांच्या मनात नकारात्मक प्रतिक्रिया उमटतात. कधी कधी कर्मचाऱयांच्या व्यक्तिगत समस्या, गैरसमज, आत्मविश्वासाचा अभाव ह्यामुळे त्यांना वरि÷ांशी किंवा सहकाऱयांशी जुळवून घेता येत नाही त्यामुळे बेशिस्त निर्माण होऊ शकते. पुढे ह्या सगळय़ा बेशिस्तपणाचा परिणाम हा विनाशात होतो. श्रीसमर्थांनी ह्याच कहाणी निरुपण समासात ह्याविषयी असे म्हटले आहे की,
विस्तार वाढला गणवेना ! वडिलांसी कोणीच मानिना ! परस्परे किंत मना ! बहुत पडिला !!
उदंड घरकळ्हो लागला ! तेणें कित्येक संहार जाला ! विपट पडिलें थोरथोरांला ! बेबंद जालें !! 13/ 05/12-13
म्हणजे, विस्तार जेव्हा अमर्याद वाढला. त्यानंतर काळ बदलला. वडिलांचे कोणीच ऐकत नव्हते. संशय वाढल्याने सामाजिक संबंध बिघडले. खूप मोठा गृहकलह पसरल्याने पुष्कळ लोक मारले गेले. वडीलधाऱयांचे एकमेकांशी पटत नव्हते त्यामुळे बेबंदशाही माजली.
मुळात बेशिस्तीची करणे ही संस्थेत किंवा संघटनेतच सुप्त स्वरूपात असतात. काही कामगार किंवा कर्मचाऱयांना वेगवेगळय़ा सवयी जडतात आणि ते आग्रही बनून शिस्तभंग करतात. अशांची संख्या कमी असली तरी त्यांचा प्रभाव पडतो. इतर कर्मचाऱयांच्या वर्तणुकीतही नकारात्मक बदल घडून येतो आणि संस्थेचे ध्येय मात्र गाठले जात नाही. शिस्तभंगाची समस्या निर्माण होऊ नये म्हणून नियम अतिशय वस्तुनि÷पणे तयार करायला हवेत. कर्मचारी किंवा कामगारांशी सुसंवाद साधायला हवा तरच बेशिस्तपणावर नियंत्रण आणता येईल.
माधव किल्लेदार