उत्तम दर्जाच्या शिक्षणाचे महत्त्व आता सर्वांनाच पटलेले आहे. त्या दृष्टीकोनातून स्वतःस अथवा स्वतःच्या पाल्यास उत्तम व प्रसिद्ध शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा असा सर्वांचाच प्रयत्न असतो. या शिवाय असेही दिसून येते की, पदवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर काही छोटे अभ्यासक्रम (सर्टिफिकेट कोर्सेस) करण्याची आवश्यकता भासत आहे. निरंतर शिक्षणाची ही एक अधिकृत सुरुवातच म्हणता येईल.
असे शिक्षण जे जाणीवपूर्वक केले जाते असे प्रत्येक वेळेस म्हणता येणार नाही, आपणा सर्वांचे बऱयाच वेळेस चालू असते, जसे कि, जेव्हा एखादी गृहिणी एखादा पाककला संदर्भात व्हिडिओ पाहून खाद्यपदार्थ बनविण्याचे शिकते तर तोही शिक्षणाचाच भाग असतो. आता असा प्रश्न बऱयाच वेळेस उपस्थित होतो कि एखादा विषय कोठून शिकावा? जर माहिती व ज्ञान देणारे अनेक स्तोत्र उपलब्ध असतील तर त्यात निवड करण्याची संधी उपलब्ध असते. उपरोधाने ज्यास व्हाट्सअप्प, यु टय़ूब, गूगल विद्यापीठ म्हटले जाते अशी भारंभार माहिती देणारी स्त्राsत उपलब्ध असता, विद्यापीठीय अभ्यासक्रमांचे, विशेषतः छोटय़ा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रयोजन तरी काय? अनेक विद्यापीठांमध्ये आजीवन/निरंतर शिक्षण विभाग असतो. या विभागामार्फत अनेक छोटे अभ्यासक्रम विकसित केले जातात. ते विकसित करीत असता अनेक पैलूंचा विचार केला जातो. माहितीची सत्यता तपासली जाते, त्याचा प्रत्यक्षातील उपयोग लक्षात घेतला जातो व ते अभ्यासक्रम अद्यावत, उपयोगी व शिकणाऱयांच्या वेळेचा सदुपयोग होईल अशी रचना त्या विषयाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून यशस्वी झालेल्यांच्या कडून करून घेतला जातो. त्यामुळे समाजमाध्यमांवरील व्हिडिओ पेक्षा ते स्वीकारण्यास अधिक योग्य असतात. तसेच या विद्यापीठिय अभ्यासक्रमाबाबत ते करण्यास आवश्यक असलेली पूर्वपीठिका, त्याची उद्दिष्टय़े, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर होणारे फायदे, संदर्भ या बाबत उहापोह असतो.
दैनंदिन जीवनातील व्यग्रतेमुळे अनेकजण वैतागून काही शिकत नाहीत, तर काही जण त्या गोष्टींचे महत्व न जाणल्याने शिकत नाहीत. वैयक्तिक तसेच व्यावसायिक दृष्टय़ा अधिक सक्षम व्हावयाचे असेल तर आजीवन शिकण्याला पर्याय नाही. निरंतर शिक्षणाचे अनेक फायदे आहेत व वेगवेगळय़ा उद्दिष्टांनुसार व्यक्ती शिकत राहू शकतात जसे की व्यक्तित्व सुधार, उद्योगातील कौशल्यात वाढ करणे, स्वतःच्या वर्तणुकीत सुधारणा करणे, स्वतःची अधिक उत्तमरीत्या काळजी घेणे, आत्मविश्वासात वाढ करणे, आयुष्यात आपण काहीतरी साध्य करीत आहे याचे समाधान मिळवणे इत्यादी. पूर्वी असलेली गृहीतके नवीन शिक्षणाने बदलू शकतात व आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारते. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातून स्वतःच्या इच्छेने केलेले नवीन शिक्षण हे तर एखाद्या संजीवनीप्रमाणे कार्य करते.
नवीन अभ्यास हा वेगवेगळय़ा विषयासंदर्भात असेल तर एखाद्या क्षेत्रातील ज्ञानाचा/ तंत्राचा वापर दुसऱया गोष्टीच्या संवर्धन, नवनिर्मिती करिता होऊ शकतो. या जगात आपण अनेक उदाहरणे अशी पाहतो की जे पारंपरिक चाकोरीबद्ध शिक्षणात सुरवातीच्या काळात यशस्वी झाले नाहीत, मात्र जीवनातील पुढील काळात त्यांनी अनेक मोठे शोध लावले, जसे की आइन्स्टिन, न्यूटन यांचा अनेक क्षेत्रांचा अभ्यास होता तो त्यांनी पारंपरिक विद्यार्थीदशा ओलांडल्यानंतर केला होता. भारतातीलच महान व्यक्तिमत्वे डॉ. विक्रम साराभाई व डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा निरंतर अभ्यास चालू असे. प्रसिद्ध चित्रकार व मूर्तिकार लिओनार्दो द विंची यांच्याबाबत असे म्हटले जाते की त्यांनी मनुष्य शरीरातील स्नायूंचा अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. जेणे करून व्यक्तीच्या हावभावातील अर्थामागच्या स्नायूंच्या भूमिका लक्षात याव्यात.
प्रत्यक्षात अर्थार्जनासाठी कार्य करीत असता, वैयक्तिक वा समाजाच्या भल्याचा विचार करीत असता बऱयाच वेळेस मनुष्यास एखादी गोष्ट अशी हवी होती, नको होती, त्यात असा बदल हवा होता असे वाटते जेणे करून काम सोपे होईल अथवा फायदा होईल, खर्च कमी होईल. असे ज्यावेळी वाटते त्यावेळी त्या व्यक्तीस स्वतःस प्रोत्साहित करणे आवश्यक असते. जेणे करून ती गोष्ट पुढे नेण्यासंदर्भात अभ्यास होईल. या प्रक्रियेस इनोवेशन अशी संज्ञा रूढ झाली आहे.
नवीन आलेले तंत्रज्ञान, वेगाने बदलत असलेले तंत्रज्ञान, रोजगार पद्धतीत होत असलेले बदल या बाबी या आधुनिक जगात वावरत असलेल्या मनुष्यास नवीन शिकण्यास बाध्य करीत आहेत व असे केले गेले नाही तर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहू शकतो. जे लोक समाज माध्यमांशी तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साधने जसेकी झूम, गूगल मीट, वेबेक्स यांसारख्यांशी सख्य राखून नव्हते त्यांनाही ते कोरोना काळात शिकावे लागले त्यातूनही अनेक चांगल्या संधी अनेकांना मिळाल्या.
आपल्या कर्मचारी वर्गाची भरती करताना उद्योगसुद्धा त्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता, क्षमता, कौशल्य, अनुभव या बरोबरच नवीन गोष्ट शिकण्याची, अंगिकारण्याची वृत्ती आवर्जून तपासतात. अनुभव हा तर कळत नकळत शिकत राहिलेल्या गोष्टींचा परिपाक म्हणता येईल.
आजीवन/निरंतर शिक्षण घेणाऱया व्यक्तींमध्ये पुढील गोष्टींची वृत्ती दिसून येते. 1. त्यांना नवीन आव्हाने स्वीकारणे आवडते. 2. आपण काय शिकलो, आपणास काय येते या बाबतचे स्वमूल्यांकन करतात तसेच दुसऱयांकडून मूल्यमापन करतात. 3. काळजीपूर्वक ऐकत असतात. 4. गोष्टी माहीत करून घेण्यास उत्सुक असतात. 5. आशा व्यक्ती चौकस असतात.
नवीन शिक्षण घेत असता, काही गोष्टींचे पालन केले असता, शिक्षण अर्धवट राहणार नाही व त्याचा पुरेसा लाभ होऊ शकेल. जसेकी 1. आपणास जे शिकण्याची आवड व इच्छा आहे त्याची यादी बनवावी. 2. एकावेळी शक्मयतो एका गोष्टीची निवड करावी. 3.त्यास लागणाऱया साहित्य/ साधनांचा अंदाज घ्यावा. 4. वेळेची निवड आपल्या हाती असेल व तसा पर्याय असेल तर पहावा. 5. शक्मयतो दररोज याचा काही वेळ अभ्यास असेल असे पाहावे, यामुळे सातत्य राहील.
उत्तमतेचा ध्यास हा मनुष्यास अधिकाधिक शिकण्यास प्रवृत्त करितो. पदवी व त्यापुढील शिक्षण हे अंतिम उद्दिष्टय़ असू नये, तर तो पाया असावा. त्या शिक्षणाचा उपयोग होऊन प्रत्यक्षातील कार्य व्हावे व ते कार्य निरंतर उत्तमोत्तम घडण्याकरिता आजीवन शिक्षण असावे.
-डॉ. प्रशांत पाटील