- अधिवेशनाचा दुसरा दिवस : वीज बिल मुद्द्यावरून विरोधक आक्रमक
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेते वाढीव वीज बिल मुद्द्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विजबिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, विजबिलासंदर्भात चर्चेतून तोडगा काढू तसेच निर्णय होईपर्यंत राज्यातील वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही, आधी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.
अजित पवार म्हणाले, ऊर्जा विभागाकडून वीज बिल मुद्यावर चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे आणि घरगुती ग्राहकांची वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल.
तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्याची वीज कनेक्शन तोडली गेली असतील त्यांची कनेक्शन पुन्हा जोडून देण्याची अशी मागणीही यावेळी केली आहे. दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या घोषणेचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, तत्पूर्वी विधानभवनाच्या गेटवर भाजप आमदार राम सातपुते यांनी आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांना वीज बिलमाफी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, सरकारकडून वीज कनेक्शन कट केली जात आहेत. सरकारनं वीज बिलाच्या मुद्यावर सावकारकी सुरु केली आहे. सरकार नीट वागल नाही तर सरकारच्या डोक्यात कृषीपंप घालण्यात येईल, असा इशारा राम सातपुते यांनी दिला होता.