अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 16 फेब्रुवारी 2022, स.11.50
● जिल्हय़ात 75 नवे रूग्ण
● पॉझिटिव्हीटी 3.15
● सर्व तालुके सावरले
प्रतिनिधी / सातारा :
राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून जिल्हय़ातही संसर्ग कमी होऊ लागला आहे. फेब्रुवारी महिना जिल्हय़ाला दिलासादायक ठरला आहे. गेली दोन वर्षे निर्बंध असल्याने शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी झाली नव्हती. यावर्षी मुख्यमंत्र्यांनी शिवजयंतीचे निर्बंध कमी केल्याने शिवजयंतीचा उत्साह वाढला आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात 75 बाधित आले असून 3.15 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर एकूण 2381 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
दोन वर्षांनी शिवजयंतीचा उत्साह
कोरोनाची तिसरी लाट लवकर ओसरत असल्याने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कमी करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्र्यांनी शिवजयंतीला 500 तर शिवज्योतसाठी 200 जणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी याचे स्वागत केले असून गावोगाव शिवजयंतीची जोमदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, आणखी पंधरा दिवसांत उर्वरित निर्बंधांबाबतही शासन निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सर्व तालुक्यांना दिलासा
सोमवारी आलेल्या अहवालात सर्वच तालुक्यांना दिलासा मिळाला आहे. सातारा येथे 13 रूग्ण आळळले असून उर्वरित सर्वच तालुके एक आकडी आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
बुधवारी जिल्हय़ात
नमुने-2381
बाधित-75
बुधवारपर्यंत जिल्हय़ात
नमुने-25,45,440
बाधित-2,78,735
मृत्यू-6,655
मुक्त-2,70,169