ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींचे वकिल ए.पी. सिंह यांनी आज पुन्हा एकदा पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली आहे. तिहार तुरुंग प्रशासनावर या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत.
या याचिकेमध्ये या प्रकरणातील दोषी अक्षय, पवन आणि विनय यांच्या वर्तणुकीसंबंधतील कागदपत्रे तिहार तुरुंग प्रशासन देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर शनिवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणी दोषींना 1 फेब्रुवारी रोजी पहाटे सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार आहे.
निर्भयाच्या दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी, दोषींना क्युरेटिव्ह आणि दया याचिका दाखल करण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासन आवश्यक कागदपत्रे देत नसल्याचा आरोप करत पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली आहे. दोषी पवन आणि अक्षयला क्युरेटिव्ह आणि दया याचिका दाखल करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने अद्याप काहीही कागदपत्रे दिलेली नाहीत, असे वकील ए. पी. सिंह यांनी म्हटले आहे.