ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात कोरोना रुग्णांबरोबरच ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने सर्वांची चिंता वाढवली आहे. देशात आगामी ५ राज्यांच्या निवडणूक होणार आहेत. निवडणूक झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनाची रूग्णसंख्य हळूहळू वाढत असून ओमायक्रॉनचा धोका देखील वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, तसेच यूपीत सुरू असलेल्या रॅलींवर देखील बंदी घालायला हवी. असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनाही तसे आवाहन केले आहे. दरम्यान निवडणूक पुढे ढकलण्यावर निवडणूक आयोग देखील या मागणीचा विचार करत असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगानं याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
देशभरातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबत घोषणा केली आहे. “सर्वच पक्षांनी निवडणुका नियोजित वेळेतच घेतल्या जाव्यात, अशी भूमिका मांडली आहे”, असं चंद्रा म्हणाले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याने होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
चंद्रा म्हणाले की, आम्हाला वाटते की, जास्तीत जास्त लोकांनी निवडणूक प्रक्रियेचा भाग बनावे. वृद्ध आणि दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची सुविधा देऊ. अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात येणार आहे.
मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात येणार आहे
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. मतदार नोंदणीचा कार्यक्रमही सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.