नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना आणि ओमिक्रॉनचा उद्रेक देशभरात झपाटय़ाने पसरत असताना, राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी निवडणुका होत असलेल्या राज्यांमध्ये 80 टक्के नागरीकांचे पूर्ण लसीकरण करावे, अशी मागणी केली आहे. तसे केल्यासच या राज्यांमध्ये निवडणुका वेळेवर आणि सुरक्षितरित्या होऊ शकतील. त्यामुळे ही व्यवस्था करावी, असा तोडगा त्यांनी सरकारला सुचविला आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कोरोना संबंधीचे नियम पाळण्याच्या सूचना जनतेला केल्या आहेत. मात्र, त्या निरर्थक आहेत. कारण त्या कोणीही पाळत नाहीत. केवळ व्यापक लसीकरणच निवडणुकांसाठी अनुकूल ठरणार आहे. इतर नियम केवळ फार्स आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये 80 टक्के पूर्ण लसीकरणाचा आग्रह धरावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
निवडणुकांच्या राज्यांमधील कोरोना स्थिती चिंताजनक नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने निवडणूक आयोगाला दिली आहे, असे वृत्त काही माध्यमांनी पसरवले आहे. मात्र ते निराधार आहे. केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला अशी कोणतीही सूचना पेलेली नाही, असे सरकारने स्यष्ट केले.