ऑनलाईन टीम / तरुण भारत
आज उत्तर प्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर इंधन दरवाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील ट्वीटद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे. कालच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला होता. गांधी यांनी भाजपवर निशाणा साधताना एका ट्विटमध्ये त्यांनी लोकांना त्यांच्या वाहनाची टाकी ताबडतोब फुल करून घेण्याचा सल्ला दिला आहे. पाच राज्यांतील निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या वाढीकडे राहुल यांनी लक्ष वेधले आहे.
मोदी सरकारची ‘इलेक्शन’ ऑफर संपणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाच राज्यांतील निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले होते. यानंतर याच मुद्यावर राष्ट्रवादी खासदार आणि सिनेकलाकार अमोल कोल्हे यांनी ही याच मुद्याकडे लक्ष वेधले आहे.“निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार, इतके दिवस निपचित पडून असलेले पेट्रोल-डिझेलचे दर जोराची उसळी घेणार! ऊन्हाचा भडका झालाय, तसा इंधन दर वाढीचाही होणार!” असं खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीटद्वार म्हटलं आहे
तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील इंधन दरवाढीबद्दल भाकीत केलेलं आहे, “पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की ७ तारखेच्या रात्री किंवा १० मार्चच्या सकाळी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतील. हे भाव वाढतील आणि सांगतील की, युक्रेनमध्ये असं घडलय, तसं घडलय…काहीपण बोलतात. कारणं तयार करतात की असं घडलं, तसं घडलं आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं. तुमच्या गाडीत पेट्रोल मोदी टाकतोय, की गरीब स्वत:च्या पैशांनी गाडीत पेट्रोल भरतोय.” असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे युक्रेन – रशिया यांच्यातील युद्धाचे पडसाद जगभरात उमटणार असले तरी महागाईने हैराण धालेल्या सामान्य नागरिकांने जगावं – कि मरावं असा प्रश्न असल्याचं ही नागरीकात चर्चा आहे.