मुंबई \ ऑनलाईन टीम
पाच राज्यांच्या विधानसभांच्या आणि पोटनिवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आहेत. या निकालानंतर देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीवरून सर्वसामान्य जनता नाराजी व्यक्त करत आहे. सर्वसामान्य जनतेसोबतच काही राजकीय मंडळी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. या दरवाढीवरूनच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “केंद्रीय अर्थ मंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवल्या जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच ! हे काय नियोजन आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा,” हवं असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने होत असल्याने सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९२.०५ रुपये आणि डिझेलची किंमत ८२.६१ रुपये प्रति लिटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे.