उत्तर प्रदेशमध्ये भाजप हारली तर त्याचे सर्वात मोठे कारण हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हडेलहप्पी व ढिसाळ राज्यकारभार असेल. गेल्या आठवडय़ात भाजपने योगींना अयोध्या अथवा मथुरा मधून उमेदवारी देण्याऐवजी गोरखपूर या त्यांच्या बालेकिल्ल्यातून उतरवले याचा अर्थच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या महत्वाच्या राज्यात सत्ताधारी पक्षाचा चेहेरा झाले आहेत असा आहे. गेली पाच वर्षे योगींच्या हुकूमशाहीला कंटाळलेले काही मंत्री आणि आमदार ज्या त्वेषाने भाजपबाहेर पडले त्याने योगींचा रथ जमिनीवर आला. एकप्रकारे आदळलाच. भाजपचे संघटन मजबूत असल्याने हा धक्का झेलला गेला. यातील काहीजणांची तिकिटे आम्ही कापणारच होतो हा भाजपचा युक्तिवाद बरोबर असेलही पण जनमानसात तो लंगडा ठरला. स्वतःला ‘दमदार’ मुख्यमंत्री म्हणून घोषित करणाऱया योगींना आपल्या पायाखाली काय जळत होते ते कळलच नाही. पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱया योगींना आता पुढील मुख्यमंत्री बनणे देखील कठीण झाले आहे.
येत्या आठवडय़ापासून उत्तर प्रदेशमधील भाजपच्या प्रचाराची जबाबदारी अमित शहा घेणार आहेत. थोडक्मयात काय तर योगींकरता दुष्काळात तेरावा महिना सुरु झाला आहे. सर्वात सुरक्षित असलेल्या त्यांच्या गोरखपूर या मतदारसंघातून योगींना समाजवादी पक्षाने तगडे आव्हान उभे केले आहे. उत्तर प्रदेश भाजपच्या दिवंगत उपाध्यक्षाची पत्नी शुभवती शुक्ल यांना योगींच्या विरोधात उभे करून तेथील ब्राह्मण समाजालाच जणू मुख्यमंत्र्याविरुद्ध उभे केले आहे. योगींच्या ठाकूरवादा विरुद्ध ब्राह्मण समाज आहे. पण हा समाज बहुतांशी भाजपचाच चाहता आहे हेदेखील निर्विवाद. जेथे आपल्या जातीचा उमेदवार आहे तिथे त्याला मत देण्याची रीत उत्तरप्रदेशात जास्तच रूढ आहे हे देखील तेव्हढेच खरे.
योगींच्या झालेल्या या फटफजितीने सर्वात जास्त कोण खुश झाले असेल तर ते उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे होत. अतिमागासवर्गीय समाजातील असलेले मौर्या हे 2017 मध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते पण अचानक कोठून कळ फिरली आणि भगवे वस्त्रधारक योगी जणू ‘आयत्या बिळावर नागोबा’ झाले. स्वामी प्रसाद मौर्या यांच्यासारखे अतिमागासवर्गातील तालेवार नेते भाजपाला वाऱयावर सोडून गेल्याने केशवप्रसाद मौर्य यांचा पक्षातील भाव वधारला आहे. अमित शहा भाजपांतर्गतच्या योगी विरोधकांना रसद पुरवणार असे सत्ताधारी वर्तुळात बोलले जात आहे. भाजप उत्तरप्रदेशात घसरली तर भावी पंतप्रधान होण्याचे योगींचे इमले मातीला मिळणार व अमित शहांची चांदी होणार अशी ही त्रांगडी खेळी आहे.
हिंदुत्वाचे वारे उत्तर प्रदेशमध्ये कमी झाले आहे असे नाही. पण त्यांचा जोर 2017 सारखा सध्यातरी अजिबात दिसत नाही. सरकारी जाहिरातींच्या मलिद्यावर पाच वर्षे मौजमजा केलेली प्रसारमाध्यमे, विशेषतः वृत्तवाहिन्या, आतापर्यंत योगींचे गुणगान गाण्यात मग्न होती. त्यामुळे जमिनीवरील परिस्थिती झाकली जात होती. निवडणुकीचे पडघम वाजताच आत्तापर्यंत निष्क्रिय वाटणारे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव कामाला लागले आहेत. कोविड महामारीतील नादान योगी सरकारचा कारभार बरा होता का मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यांच्यात माणूसकी जास्त होती हा विचार जर जनमानसात घर करू लागला तर भाजपच्या भोम्पूचे चालणार नाही. बसपच्या मायावती अजून सक्रियच झालेल्या नाहीत तर प्रियांका गांधी मोठय़ा नेत्या असल्या तरी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे संघटनच नाही. ‘लडकी हूँ, लड सकती हूं।’ अशी घोषणा देत प्रियंका भावी काळातील राजकारण करत आहेत.
पंजाबमध्ये भगवंत मान या जुन्याजाणत्या विनोदवीराला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवून आम आदमी पक्षाने काँग्रेससमोर कितपत आव्हान उभे केले आहे ते निवडणुकीनंतर कळेल. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना आपल्या काँग्रेस पक्षातून देखील एका विनोदवीराकडून आव्हान मिळत आहे. कपिल शर्मा शो मध्ये जज बनणारे ते नवज्योतसिंग सिद्धू होत. प्रदेशाध्यक्ष या नात्याने अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून काढण्यात मोलाचा हातभार लावल्याने त्यांची महत्वाकांक्षा देखील जागृत झाली नसती तरच नवल होते. आपला मामा बनवला गेला आहे असे सिद्धूंना वाटत आहे.
चन्नी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री आहेत आणि त्या राज्यात दलितांची संख्या चांगलीच आहे. चन्नी यांना लवकरच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून राहुल गांधी घोषणा करतील अशी चर्चा आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे हे जाहीर केल्याचा फायदा होतो. गेल्या वेळेस अमरिंदर सिंग यांच्या नावाने निवडणूक लढवल्याने काँग्रेसला फायदा झाला होता.
उत्तराखंडमध्ये भाजपचे चार वर्षे मुख्यमंत्री राहिलेले त्रिवेंद्र सिंग रावत यांनी स्वतःच निवडणुकीतून पळ काढला आहे. आपल्याला उमेदवारी देऊ नये असे पत्र त्यांनी स्वतःच मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना लिहून भाजपच्या श्रेष्ठींना जणू टोला लगावला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत हे दोन्ही मतदारसंघातून जोरदार आपटले होते याची त्यांना जाणीव आहे. वेळ बदलल्याने तेच हरीश रावत आतापासूनच भावी मुख्यमंत्र्यांच्या तोऱयात वावरत आहेत. ‘मी शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे’, असेच काहीसे आव्हान त्यांनी पक्ष श्रे÷ाrंना दिले आहे. छोटय़ा मतदार संघांमुळे बरेच पक्ष मैदानात उतरल्याने गोव्यातील निवडणूक हा खिचडी बनवण्याचा प्रकार झाला आहे. असे राष्ट्रीय राजधानीतून भासत आहे. यात मुख्यमंत्री कोण आहे आणि कोण होणार हे खिचडी कशी बनणार यावर अवलंबून आहे. उत्तरपूर्वेतील सुदूर मणिपूरमध्ये भाजपची ताकद बऱयापैकी आहे आणि काँग्रेसला घाम गाळावा लागत आहे अशी वृत्ते आहेत. रात्र वैऱयाची आहे. अशक्मयाला शक्मय करण्यासाठी आता मोदी काय करतात यावर साऱयांचे लक्ष आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ अशी अपेक्षा करणाऱयाच्या कसोटीची घडी आहे.
सुनील गाताडे